लहान असो वा मोठी, प्रत्येक जातधर्मीय दंगल, आपल्या अंत:करणाची चिरफाड करुन जाते… हे कुठेतरी, कधितरी कायमचं नियंत्रणात यायलाच हवं!!!

शिवछत्रपतींच्या जाज्वल्य राजनीतिनुसार, कोण कुठल्या जातधर्माचा आहे, याकडे कवडीमात्र लक्ष न देता…. जातीय-धार्मिक दंगलीत दिसतील तेवढ्या शस्त्रसज्ज दंगलखोरांना बेधडक गोळ्या घाला…. पण, एकाही निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ देऊ नका!

पोलीस वा लष्करी गोळीबारात ठार होणाऱ्या अशा दंगेखोरांची संख्या, आपल्यासाठी, केवळ एक ‘गणितीसंख्या’ बनू द्या… यापेक्षा, अधिक त्याचं ‘मूल्य’ असताच कामा नये!

मात्र, लष्कर-पोलीसदलातील अधिकारीवर्ग हा, शिवछत्रपतींच्याच राजनीतिनुसार सुसंस्कारी, भ्रष्टतामुक्त व ‘जातधर्मनिरपेक्ष’ घडवण्यासाठी… या देशात फोफावलेला भ्रष्टाचार व जातधर्माचं राजकारण धर्मराज्य च्या वज्रमुठीनं संपुष्टात आणा !!!

त्याकामी, ‘धर्मराज्य पक्षा’ची त्रिसूत्री व्यवहारात सक्षमपणे आणि कठोरपणे उतरवा…. Zero Tolerance towards Corruption & Exploitation of Man and Nature !!!

जय महाराष्ट्र | जय हिंद ||

                                           ….. राजन राजे ( अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)