एखाद्या चित्रपटाची ‘सिक्वेल’ (वंशावळ) चालू असते…तसं मग, अचानक लक्षात येतं की, हा पठाणकोट-उरी-पुलवामा, असं वन-टू-थ्री झाल्यानंतरचा ‘चौथा एपिसोड’ होता; फक्त, त्यात तेरा हजार कि. मी. लांबवर रहाणार्या ‘परदेशी मित्राचा हस्तक्षेप’, हे एक ‘नवंनाट्य’ (किंवा हवंतरं ‘वगनाट्य’ म्हणा) कथानकाला जोडलं जातं…बाकी, सुरक्षिततेतल्या गंभीर त्रुटी वा गुप्तचरविभागाचं दारुण अपयश (पाॅलिश्ड भाषेत ‘सिक्युरिटी लॅप्सेस व इंटेलिजन्स फेल्युअर), हे मसाला-चित्रपटातल्या ‘प्रेमाच्या त्रिकोणा’सारखा कथानकाचा ‘ढाचा’ तसाच कायम रहातो…थोड्याफार फरकाने बाकी देखील तेच घडतं रहातं; बरं, असं का म्हणायचं तर रावळपिंडी, लाहोर, कराची वगैरे ‘शत्रूप्रदेश’ गोदी-मिडीयातून गलेलठ्ठ पगार लाटणाऱ्या ‘अँकर्स’नी…सत्यसाईबाबांसारखा हवेत हात फिरवून जादूई करामतीने आपल्या पदरात अलगद टाकला असला; तरी, प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी कायमच रहाते की, “आपला हक्काचा पाकव्याप्त काश्मीर, साॅरी ‘POK’, पेहेलगामसारख्या मोठ्या निमित्ताने ताब्यात घ्यायचा; म्हणजेच, नेहरुंची घोडचूक सुधारायचं, तसंच राहूनच जातंय”…ते ही, १९४८च्या तुलनेत आजचं भारताचं लष्करी-सामर्थ्य एवढं प्रबळ व अर्थव्यवस्था तीन ट्रिल्यन-डाॅलरची झाल्यानंतरही आणि आजचं पाकिस्तान, ‘फेल्ड-स्टेट’ असतानाही?
…एक ना दोन, तब्बल गेली दहा-अकरा वर्षे आमचं घोडं, ते आणि तिथेच पेंड खातंय…राहीला मोलाचा सवाल, असंच कच खाणं चालू राहीलं; तर मग अंधभक्तांचा ‘अखंड हिंदुस्थान’ अन् दिवसाउजेडी त्यांना पडणाऱ्या त्यांच्या स्वप्नातलं ‘हिंदूराष्ट्र’, दोन्ही कसं आणि कधि होणार?
…पण, चौथा एपिसोड पुरा होईपर्यंत पेहेलगामचा ‘सिंदूर’ लावून अंबानींनी आणि चौपट भाडं आकारुन विमान-कंपन्यांनी आपलं उखळ पांढरं करायची संधी मात्र छानशी साधलेली असतेच, हे त्या चौथ्या एपिसोडचं नवं पार्श्वसंगीत किंवा ‘शरबत-जिहाद’चा ‘भांडवली-अवतार’च…आणि, हो तो ही अर्थातच, शत्रूऐवजी भारतीय जनतेविरुद्ध पुकारलेला!
…एक गोष्ट बाकी वाखाणण्याजोगी ती म्हणजे, २०२२ पर्यंत सगळ्यांनाच घरं, नोटबंदीनंतरचा भ्रष्टाचारमुक्त भारत, प्रत्येक वर्षी २ कोटी चांगले रोजगार, ५ ट्रिल्यन-डाॅलर इकाॅनाॅमी ते थेट २०४७ पर्यंत पूर्ण विकसित भारत वगैरे वगैरे मालिकेतलं एक ‘गाजर’ भारतीय जनतेपुढे धरण्यास आपले भाजप-संघीय राज्यकर्ते विसरलेले नाहीत…ते म्हणजे, पुन्हा असा दहशतवादी हल्ला झाला; तर, पाकिस्तानला नकाशावरुन पुसून टाकण्याचं ‘गाजर’…”निवडणुका लढणं आणि युद्ध लढणं”, यातला फरक असतो तो असा!
…झाली ना, अगदी तीव्रतेनं, इंदिरा गांधींची आठवण…???
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)