“इंडिया एक आयडिया”: जनजागरण-लेखमालिका… लेख-अनुक्रमांक १

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १


गौतम बुद्धाकडे एकदा एक माणूस आपल्या समस्यांची जंत्री मांडू लागला. त्याच म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गौतम बुद्ध म्हणाले, “तू मांडलेल्या ८३ समस्या सोडविण्यास मी ‘असमर्थ’ आहे…पण, त्यातली शेवटची ८४वी समस्या मात्र, मी नक्कीच सोडवू शकतो आणि ती सोडवली की, तुझ्या बाकी समस्या सुटण्याचा मार्ग तुला सापडेल. तिचं तुझ्या सगळ्या समस्यांची ‘गुरुकिल्ली’ आहे…’तुझ्या आयुष्यात, त्या ८३पैकी कुठलीही समस्या असणंच तुला नको आहे’, हीच तुझी ८४वी समस्या आहे. ही तुझी वांछा, जी तुझ्या नियंत्रणात आहे, तिचं तू त्यागलीस की, तुझ्या अगोदरच्या ८३ समस्या हळूहळू सुटू लागतील. आपल्या नियंत्रणात असलेल्या समस्या आपण सोडवल्या; तरच, मृत्यू, आजार, निसर्गाची अवकृपा, लोकांच्या टीका…यासारख्या, आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या समस्यांवरचा मार्ग सापडतो; अन्यथा, नव्हे!”

तेव्हा मतदारराजा, लोकसभा-निवडणुकीत जागरुकतेनं मतदान करणं…एवढंच, सद्यस्थितीत तुझ्या नियंत्रणात आहे. देशात अक्राळविक्राळ पसरलेल्या हुकूमशाहीचा नंगानाच, सरकारी-यंत्रणांची बेलगाम दहशत, पुढल्या पिढ्यांचं धोक्यात आलेलं भविष्य, अमानुष आर्थिक-विषमता, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी-अर्धरोजगारी, तथाकथित विकास वगैरे समस्यांच्या सोडवणुकीची, तिचं ‘गुरुकिल्ली’ आहे!

जागरुकतेनं मतदान करणं म्हणजे, देशापुढची सगळ्यात मोठी व मूलभूत समस्या जाणून घेणं आणि नेमकी ती कोणामुळे निर्माण झालीय व ती समस्या नक्की कोण सोडवू शकेल, याचं नीट आकलन होणं होय.
आर्थिक-विषमता, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी-अर्धरोजगारी, विकास वगैरे समस्या पूर्वीही होत्या आणि याहीपुढे थोड्याफार प्रमाणात त्या राहतीलच…पण, देशापुढची सध्याची सगळ्यात मोठी व पिढ्यापिढ्यांचं भयंकर नुकसान करु शकणारी, अशी समस्या कुठली असेल; तर ती, *देशात भाजपाई-संघीय नरेंद्र मोदी सरकारने लादलेली ‘अघोषित आणीबाणी’, ही होय!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)