नेमेची येतो १ मे रोजी, तो कामगार व महाराष्ट्र दिन….

३ काळ्या शेतकरी-कायद्यांचा वरंवटा शेतकऱ्यांवर फिरवण्याचा प्रयोग, शेतकऱ्यांच्या आंदोलनाने व शेकडो शेतकऱ्यांच्या आहुती-बलिदानाने साफ फसल्यानंतर…४ काळ्या कामगार-कायद्यांची ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात, ‘देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार’ या ‘भाजप-संघीय’ ट्रिपल-इंजिन सरकारकडून लागू करण्यात येतेय; याचाच सरळ अर्थ, अर्धमेल्या झालेल्या कामगार-चळवळीला ‘शवपेटी’त कोंडून, शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचं काम सुरु झालंय…. तरीही तुम्ही दारु, सण-उत्सवाच्या नशेत आणि क्षुद्र स्वार्थ-अहंकारापोटी ‘भांडवली-व्यवस्थे’विरुद्ध लढण्याऐवजी, आपापसातच लढण्यात व कामगार-एकजूट फोडण्यातच दंग…???
—————————-
“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा…पाठीवरती हात देऊन, तुम्ही फक्त लढ तर म्हणा”…असं लढवय्या मराठी-तरुणाईचं बुलंद वर्णन करणाऱ्या, ‘महाकवी’ कुसुमाग्रजांच्या महाराष्ट्रातच आज…’श्रमाविना संपत्ती कमावणाऱ्या’ महापातकी राजकारणी-कंत्राटदारांनी आणलेल्या, कंत्राटी-कामगार पध्दतीच्या ‘गुलामगिरी-नवअस्पृश्यते’मुळे मराठी-तरुणाईचा ‘पाठकणा’च मोडून पडलाय!
…एका ‘बाबासाहेबा’ने शेकडो वर्षांची ‘गुलामगिरी व अस्पृश्यता’ नष्ट केली; तर, आजच्या राजकारणी ‘दुकानदार’साहेबांनी कंत्राटी-कामगार पद्धतीद्वारे अन्याय-अत्याचार व शोषणाचा ‘भांडवली-कहर’ माजवणारी, ‘नवगुलामगिरी व नवअस्पृश्यता’ आणली!
“परप्रांतीयांकडे आज येथे, ‘मालमत्ता-मानसन्मान’ आहे…महाराष्ट्रदेशी, मराठा ‘कंत्राटी-गुलामी’त ‘बंदिवान’ आहे!”

…’पाठकणा’ मोडून पडलेल्या या मायमराठ्यांना ताठ मानेनं उभं करण्यासाठी…’धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे ‘कंत्राटी-कामगार पध्दती’विरुद्ध धर्मयुद्ध सुरुच!”
…‘कंत्राटी-कामगार’ प्रथेवर घाला…न्याय, मराठी-कामगाराला…!!!
…“धर्मराज्य पक्षाला ‘मतदान’, म्हणजे ‘कंत्राटी-कामगार’ प्रथेला ‘पिंडदान’!”
——————–
“कुणी मराठी माणसाची नोकरी, व्यवसाय बुडवला…कोणामुळे मराठी माणसाचा ‘सातबारा’ जातोयं खोडला….
कोणा कारणे, काळ्या आईचा भरबाजारी मांडला जातोयं ‘भोंडला’…शिवबांच्या महाराष्ट्राचा कुणी ‘ताठ कणा’ मोडला….???”
नोकऱ्या गेल्या…पिढ्यापिढ्यांचे धंदे-व्यवसाय बुडाले….
महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरची मराठी नावं पुसली जातायतं….
…जणू, महाराष्ट्राची जमीनच मायमराठ्यांच्या पायाखालून सरकतेयं; तरी, मराठी-माणूस काय अजून ‘आभाळ’ कोसळण्याची वाट बघतोयं…???

पारतंत्र्याच्या काळात म्हटलं जायचं, “तराजू-तागडी धरोनि हाती, जिंकीला भारत ‘साहेबा’ने !”
…तर, आता म्हणावं लागेल, “एका हाती धरोनि तराजू-तागडी आणि दुसऱ्या हाती धरोनि राजकीय-मराठी हात, जिंकीला महाराष्ट्र…जैन-गुजराथी-मारवाड्यांनी…!!!”

…स्वातंत्र्यापश्चात कायदा-सुव्यवस्था पाळणाऱ्या शिवबा-संतांच्या पावनभूमी महाराष्ट्रात ‘संपत्ती-निर्मिती’ प्रक्रियेनं वेग धारण केल्यानंतर, वरुन अवघा महाराष्ट्र लुटणारे जैन-गुजराथी-मारवाडी भांडवली धनदांडगे आणि खालून उत्तर भारतीयांचे अनियंत्रित लोंढे…यांच्यामध्ये, ‘सॅण्डविच’ होऊन मायमराठ्यांचा उत्तरोत्तर असह्य कोंडमारा होऊ लागला….
…त्यामुळे, सत्तेमत्तेच्या आहारी गेलेल्या भ्रष्ट, दलाल मराठी-राजकारण्यांच्या अगदी पथ्यावर पडणारी; एक भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली…त्यातूनच, “महाराष्ट्रात निर्माण होणारी संपत्ती, हळूहळू महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मायमराठी माणसांच्या मुळावर येऊ लागली आणि आजच्या घडीला आपल्या हक्काच्या महाराष्ट्रातच सामान्य मराठी-माणूस ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागलाय….
…तेव्हा, “झोपी गेल्या मराठी माणसा ऊठ, ‘धर्मराज्य’ के अलावा बाकी सब झूठ”!
—————————–
“हीनदीन झालेल्या मायमराठ्यांना, शिवछत्रपतींच्या राजनितीचं आश्वासन देणारा, कामगारदिनाचा आणि महाराष्ट्रदिनाचा खास ‘धर्मराज्य-सलाम’!”

जय हिंद, जय महाराष्ट्र’ नव्हे; यापुढे गर्जत म्हणा….
|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||

“संयुक्त-महाराष्ट्रानंतर ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…शिवछत्रपतीराष्ट्र”!

….राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)