- वर्ष-२०१९ पर्यंत, (जोपर्यंत, कामगार-घातकी फुटीरगटाला डोकं वर काढण्याची संधिच कधि मिळाली नव्हती) संघर्षरत राहून “गुलामगिरी व नव-अस्पृश्यता” स्वरुप असलेल्या, “कंत्राटी-कामगार पद्धती”ला एकजुटीने ठोकरुन लावणाऱ्या,
- भारतात सहा आकडी (रु. एक लाखाहून अधिक) पगार,
- वर्ष-२०१९ पर्यंत, (जोपर्यंत, कामगार-घातकी फुटीरगटाला डोकं वर काढण्याची संधिच मिळाली नव्हती) एकूण १२ वर्षे सहा आकडी विक्रमी बोनस देणाऱ्या आणि,
- केवळ, शिवछत्रपती-नीतिनुसारच चालणाऱ्या…. “सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज् युनियन”च्या (..सेऊ) २१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने (२१ फेब्रुवारी-२०२१)……..
“शिवछत्रपती, म्हणजे, केवळ ‘तलवारबाजी’ नव्हती; तर, उच्चकोटीच्या जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘जातधर्मनिरपेक्ष प्राणांची बाजी’ होती… शिवछत्रपतींचा भर ‘तलवारी’पेक्षा ‘नांगरा’वर आणि ‘नागरी-संस्कृती’वर होता”!
…तत्कालीन कुळांना जमिनीचे पट्टे कसायला देऊन शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्याला स्थिरता दिली… ही त्यावेळची, एक प्रकारची फार मोठी सामाजिक-आर्थिक क्रांतिच होती… त्याचा, आजच्या परिभाषेत जर, अर्थ लावायचा झाला; तर, तो सरळसोट असा की, “आज शिवछत्रपती हयात असते तर, त्यांनी आपल्या शिवराज्यातल्या अभागी ‘कुळां’ना जीवनसन्मान प्रदान केला; अगदी त्याप्रमाणेच, “कंत्राटी-कामगार प्रथेच्या गुलामीत अथवा ‘नीम (NEEM)च्या अमानुष पिळवणूक-चक्रात अडकलेल्या तळागाळातील हतबल व उध्वस्ततेचं जीवन जगणाऱ्या श्रमिकवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन, त्यांच्या जीवनात सुखसमाधान फुलवलं असतं… तहहयात टांगणीवर असणाऱ्या त्यांच्या गुलामीच्या अनिश्चित-अस्थिर जगण्याला ‘स्थिरता’ दिली”!!तसेच, “शिवछत्रपतींनी ‘वतने’ खालसा केली”… म्हणजे, “आजच्या परिस्थितीत बोलायचं तर, उन्मत्त झालेल्या मूठभर प्रस्थापित धनदांडग्यांचं, मातलेल्या सरकारी व खाजगी कंपन्यांतल्या अधिकारीवर्गाचं बहुजन समाजावरील अन्यायी-अत्याचारी वर्चस्व नष्ट केलं”!!!
….असा सगळा, सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी शिवछत्रपतींचा कारभार असतानाही, उठताबसता शिवछत्रपतींचं नांव घेणारे बदमाष राजकारणी, बरोबर त्यांच्या विरुद्ध व्यवहार करताना; म्हणजेच, आपल्या अमानुष स्वार्थापोटी भांडवलदारांची दलाली करत, “कंत्राटी अथवा नीम(NEEM) पद्धतीची गुलामगिरी व नव-अस्पृश्यता” महाराष्ट्रात सर्वत्र पसरवताना दिसतायत…. हे, नुसतचं संतापजनक नव्हे; तर, आपल्या मराठी मनोदौर्बल्याचं, राजकीय-ग्लानीचं आणि मानसिक-गुलामगिरीचं…. शरमेनं मान खाली घालायला लावणारं प्रतिक होय!!!!
…या आपल्या लोकशाहीत, ‘शिवराज्य’ निर्माण व्हायचंच झालं; तर, आपल्यापैकी प्रत्येकाला जाज्वल्य ‘मावळा’ बनावं लागेलं आणि शक्य तिथे, ‘धर्मराज्य पक्षा’चा पाईक होऊन निवडणुकीसमयी मतदानपेटीद्वारे प्रस्थापित राजकीय पक्षांचा ‘कोथळा’ काढावा लागेल!
…राजन राजे {संस्थापकीय अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ आणि सेऊ (SEU)}