कामगार व उद्योग (Labour & Industry)

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ५

मराठी कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं तिसरं प्रमुख कारण म्हणजे…जगभरात प्रगत देशांमध्ये ‘कामगारविश्वाभोवतीच राजकारणाची दुनिया फिरत असते आणि कामगार नेतेच बव्हंशी देशाचं राजकारण चालवतात… तर, आमच्या महाराष्ट्र-देशात याच्या पूर्णतः विपरीत स्थिती आहे! ‘कामगार-धर्मा’च्या अथवा कामगारांच्या ‘वर्ग-जाणिवे’च्या दृष्टीकोनातून कामगार-कर्मचारीवर्ग निद्रिस्त असल्यामुळे, जाज्वल्य कामगार नेत्यांना राजकारणात काळं कुत्रं देखील विचारत नाही! आणि, त्यामुळेच, त्यांच्यात फूट पाडणं, […]

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….लेख क्रमांक ५ Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ४)

कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे…त्यांच्यात एकप्रकारे ‘बुद्धीमांद्य’ निर्माण करुन, त्यांना जीवन-संघर्षापासून दूर नेणाऱ्या आणि त्यांना ‘दैववादी’ बनवणाऱ्या यच्चयावत सगळ्याच धर्मसंप्रदायांची महाराष्ट्रभरात झालेली मोकाट पैदास! ‘हिंदुत्वा’च्या भंडार्‍याची उधळण करतच महाराष्ट्रात ‘दैववादा’ला व किंकर्तव्यमूढतेला एकच उधाण आणण्यात आलं….त्याचाच भाग म्हणून पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या-कावळ्यांच्या छत्र्यांप्रमाणेच बैठक-संप्रदाय, बापू संप्रदाय, जीवनमिशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वाध्याय-परिवार,

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ४) Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ३)

…अर्थातच, ‘कामगार-चळवळ’ आणि पावसाळ्यातील ‘गांडुळांची वळवळ’… हे जवळपास समानार्थी शब्द बनण्याचा संपूर्ण दोष, केवळ मराठी-कामगारांना देण्यात बिलकूल हशील नाहीच; कारण, चारपाच दशकांपासून आमच्या मराठी-मनावर ‘गारुड’ करुन बसलेल्या प्रभावशाली ‘भांडवल-धार्जिण्या’ राजकीय नेत्यांकडूनच टप्प्याटप्प्याने व अत्यंत पद्धतशीरपणे मराठी-कामगारांचं ‘खच्चीकरण’ करण्यात आलंय {ज्याचा पहिला टप्पा, हा साम्यवाद्यांना ‘लाल माकडं’ म्हणून हिणवत त्यांची प्रचंड नालस्ती करण्याचा…भडक माथ्याच्या अविचारी-अविवेकी मराठी-तरुणांना

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ३) Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक २)

…जरी, CPM सत्तारूढ स्टॅलिन-सरकारचा घटक-पक्ष असला; तरी, फारशा राजकीय-पाठबळाविनाच निव्वळ कामगारांच्या पोलादी एकजुटीच्या व वज्रनिर्धाराच्या बळावर…उन्मत्त झालेल्या ‘सॅमसंग-व्यवस्थापना’ला, ज्यापद्धतीने सॅमसंगच्या लढाऊ कामगारांनी (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ‘CITU’/’सिटू’ युनियन) नमवलंय …त्याला, महाराष्ट्रभरातील कामगारांतर्फे “धर्मराज्य-सलाम”! हा, दाक्षिणात्य (विशेषतः, केरळ, तामीळनाडुमधील) आणि बंगाली कामगार-कर्मचारीवर्गाचा ज्वलंत-जाज्वल्य लढाऊ बाणा, ‘मराठी-कामगारां’च्या रक्तात कधि उतरणार? …चार शतकांपूर्वी एक ‘शिवाजी’ जन्माला येतो काय अन्

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक २) Read More »

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच…..

सिटू (CITU…सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स) या मार्क्सवादी-कम्युनिस्ट पक्षाच्या (जो तामीळनाडूत DMK आघाडीचा सहयोगी पक्ष आहे) संघटनेशी संलग्न असलेल्या ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने पुकारलेला संप, पोलिसी-दडपशाहीला झुगारुन सप्टेंबर ९-२०२४ पासून सुरु असून, कदाचित उद्याच्या बुधवारी (दि.१७ ऑक्टोबर-२०२४) तो संपेलही; पण, त्याचं ‘कवित्व’ दीर्घकाळ शिल्लक राहीलच! …चांगल्या दर्जाचं अन्न कॅन्टीनमधून देणे, कामगार-कर्मचारीवर्गाला येण्याजाण्यासाठी वातानुकूलित एसी-बसेस पुरविणे

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच….. Read More »

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय!

“महाराष्ट्रात महागुंतवणूक” अशा दिलखेचक शीर्षकाखाली लिथियम बॅटरी, EV, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मितीच्या वगैरे क्षेत्रातील ८१ हजार कोटींच्या राज्यातील गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांची व त्यातून, २०-२५ हजार थेट रोजगारांची; तर, ५० हजार अप्रत्यक्ष रोजगारांची राणाभीमदेवी थाटात देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मोठी गर्जना केलीय (उपमुख्यमंत्री अशा महत्त्वपूर्ण घोषणा करत असतात…तेव्हा, मुख्यमंत्री फक्त ‘तोंडी लावण्यापुरतेच’). या घोषणांचे पतंग हवेत

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय! Read More »

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)….

ज्या फ्रेंच-राज्यक्रांतीनंतरच, संसदेत बसण्याच्या व्यवस्थेतून ‘डावे’ (साम्यवादी-समाजवादी गट) आणि ‘उजवे’ (भांडवलवादी गट) अशा दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांचं विभाजन जगभरात रूढ झालं…त्याच फ्रान्समधे, नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रेंच नॅशनल ॲसेंब्ली’च्या सार्वत्रिक-निवडणुकीत डाव्यांना मोठा ऐतिहासिक विजय मिळालाय… आणि, तो विजय म्हणजे जणू, युरोप-अमेरिकेसारख्या भांडवलप्रधान राष्ट्रांमधल्या बदलत्या सामाजिक व राजकीय वातावरणाची नांदीच होय! यंदाच्या फ्रान्समधील निवडणुकीत ‘न्यू पाॅप्युलर फ्रंट’

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)…. Read More »

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत…..

एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्‍या…आणि, दुसर्‍या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’…. ———————————————– ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत….. Read More »

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!!

**जर कुठले बडे राजकारणी किंवा बडे सरकारी अधिकारी अथवा त्यांचे कुटुंबिय…जर, या ‘मानवनिर्मित’ आपदेत सापडले असते; तर, सुटकेसाठी एवढा प्रदीर्घ काळ लागला असता का? **समस्त पर्यावरणतज्ज्ञ ठिसूळ हिमालयीन प्रदेशाशी बोगदा खणणे, खाणकाम करणे वगैरे धोकादायक खेळू नका, असे तडफडून सांगत असताना व यापूर्वी, अशा दुःसाहसातून अनेक जीवघेण्या मोठमोठ्या दुर्घटना घडल्या असतानाही…निसर्गाशी द्यूत खेळण्याचा, हा अवसानघातकी

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »