Rajan Raje

कुठल्याही कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून वाचावं, असं काही….

१५ जून-२०२५ रविवारचा तो पावसाळी दिवस आणि त्या एकाच दिवशी समस्त कामगारवर्गासाठी अतिशय उद्बोधक, असे दोन कार्यक्रम घडून गेले…आणि, ते होते, एकाच कंपनीतल्या दोन निवृत्त कामगारांच्या संबंधाने…कंपनीचं नाव सुल्झर पंप्स, दिघा (नवी मुंबई) आणि कामगारांची नावं अनुक्रमे प्रफुल्ल मुणगेकर व काशिनाथ वडगावकर. प्रफुल्ल मुणगेकरचा कंपनीतल्या कामगारांनी आयोजित केलेला निवृत्ती-समारंभ सकाळी होता; तर, काशिनाथ वडगावकर, या […]

कुठल्याही कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून वाचावं, असं काही…. Read More »

बुद्धी, विज्ञान आणि सारिम खान…आणि इथं ढोल, डीजे, आणि गुलामगिरी!

अतिशय स्वागतार्ह तसेच, आनंदाश्चर्याची बाब ही की, आपल्या मुस्लिम समाजात आणखी एक, एपीजे अब्दुल कलामांच्याही शंभर पावले पुढे, असा अलौकिक प्रतिभेचा पदार्थविज्ञान-शास्त्रज्ञ तयार होत आहे…बिहार सीमेलगतच्या उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातील ‘सारिम खान’ हा, मोहसीन खान आणि झिन्नत खान, या मुस्लिम-दांपत्याचा ११ वर्षाचा अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा मुलगा, सध्या भल्याभल्यांना आपल्या बौद्धिक-आविष्काराने तोंडात बोटं घालायला लावतोय! मुस्लिम

बुद्धी, विज्ञान आणि सारिम खान…आणि इथं ढोल, डीजे, आणि गुलामगिरी! Read More »

हिंदीत देशभक्त, इंग्रजीत धमकी – ट्रिपल इंजिनाचं भाषिक राजकारण!

‘ट्रिपल-इंजिन’वाल्या सरकारच्या ‘त्रैभाषिक’ (ट्रिपल-लँग्वेज) धोरणानुसार पहिल्या इयत्तेपासून महाराष्ट्रात शिकवली जाणार; एवढ्यापुरतचं, सध्याच्या ‘बीजेपी’ने सडवलेल्या भारतीय राजकारणात ‘हिंदी’चं अप्रूप नव्हे…तर, ‘‘भारत-पाकमध्ये मीच मध्यस्थी केली’’, असं एकूण चौदा वेळा जाहीरपणे सांगून आपली चांगलीच ‘गोची’ करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप यांना; त्यांना न कळणार्‍या ‘हिंदी’ भाषेतच, ‘‘कुणा त्रयस्थाची मध्यस्थी स्विकारणार नाही’’, असं मोदी सुनावतात…’’नरेंदर सरेंडर’’ या ‘‘आपल्यावरच्या कडव्या टिकेचा साप

हिंदीत देशभक्त, इंग्रजीत धमकी – ट्रिपल इंजिनाचं भाषिक राजकारण! Read More »

“जागतिक तापमानवाढीचा आनुषंगिक परिणाम म्हणून गाढवं शहाणी व्हायला लागलीयत (पूर्वीसारखी माणसांची बिनतक्रार हुकूमत आता ती मानत नाहीत); तर, माणसं गाढवासारखी वागायलीयत अन् ‘जातधर्मविद्वेष, युद्धोन्माद, माणूस व निसर्गाचं टोकाचं शोषण’ यात अधिकाधिक गुंतू लागलीयत!” ….एका आंतरराष्ट्रीय मानसतज्ज्ञांच्या पथकाचा पहाणी अहवाल

वरील बातमीतले, आपले पूर्वज असलेले ‘माकड’, आपल्याला ‘शहाणपण’ शिकवू पहातेय की, “सरतेशेवटी, चलनी नोटा, या केवळ ‘कागदमात्र’ आहेत (हा ‘धडा’, एक ‘राजकीय गधडा’, वेगळ्या अर्थाने आपल्याला आठनऊ वर्षांपूर्वीच शिकवून गेलाय)…त्या खाऊन काही ‘उदरभरण’ होऊ शकत नाही!” आधुनिक भांडवली अर्थव्यवस्था व जीवनशैलीजन्य कार्बन-ऊत्सर्जनातून उद्भवलेल्या जागतिक तापमानवाढीच्या महासंकटामुळे पुढील काही दशकातच, समस्त मनुष्यजातीला, वरील वैश्विक-सत्याचा प्रलयंकारी सामना

“जागतिक तापमानवाढीचा आनुषंगिक परिणाम म्हणून गाढवं शहाणी व्हायला लागलीयत (पूर्वीसारखी माणसांची बिनतक्रार हुकूमत आता ती मानत नाहीत); तर, माणसं गाढवासारखी वागायलीयत अन् ‘जातधर्मविद्वेष, युद्धोन्माद, माणूस व निसर्गाचं टोकाचं शोषण’ यात अधिकाधिक गुंतू लागलीयत!” ….एका आंतरराष्ट्रीय मानसतज्ज्ञांच्या पथकाचा पहाणी अहवाल Read More »

एका ‘शामभट्टाच्या तट्टाणी’ला…पं. नेहरुंसारख्या ‘इंद्राच्या ऐरावता’सह यच्चयावत सर्व पंतप्रधानांपेक्षा, निर्लज्ज-निरर्गल पद्धतीने मोठा दर्जा देऊ पहाणाऱ्या…AM-आयटी सेलची लक्तरं काढणं काय असतं, ते बघाच….

**’आय.क्यू.’ (I.Q.) अतिशय कमी असलेला पहिला पंतप्रधान… उदा. गटारातल्या गॅसवर स्वयंपाक करणारा, पाकिस्तानच्या रडारला चकवण्यासाठी ढगाआडून सर्जिकल-स्ट्राईक करणारा आणि अस्तित्वात नसलेल्या रेल्वे-स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा…समजा, अशातऱ्हेनं पंतप्रधानांच्या बुद्धीवर टिपणी केल्याबद्दल; जर कुणावर बदनामीचा खटला भरला गेला आणि न्यायाधीशाने कुणाला शिक्षा केलीच; तर, ती यासाठी असेल की, त्याने ‘भारताचं सर्वोच्च राष्ट्रीय गुपित’ जगासमोर उघडं केलं म्हणून….

एका ‘शामभट्टाच्या तट्टाणी’ला…पं. नेहरुंसारख्या ‘इंद्राच्या ऐरावता’सह यच्चयावत सर्व पंतप्रधानांपेक्षा, निर्लज्ज-निरर्गल पद्धतीने मोठा दर्जा देऊ पहाणाऱ्या…AM-आयटी सेलची लक्तरं काढणं काय असतं, ते बघाच…. Read More »

‘‘धार्मिक महोत्सव, खेळ महोत्सव आणि ‘जनतेचं’ विसर्जन’’

ही भीषण अवस्था, यापूर्वीही महाराष्ट्रात १६ एप्रिल-२०२३ रोजीच्या खारघरच्या सेंट्रल-पार्कमधील बैठक-संप्रदायाचे सर्वेसर्वा नाना धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमात दिसली…तिथे डझनावरी भोळ्याभाबड्या जीवांचे प्राण, निव्वळ बड्या राजकारण्यांच्या सोयीसाठी आयोजन केल्या गेलेल्या तेथील ऐन रणरणत्या उन्हातील निर्मम अव्यवस्थेमुळे तडफडून गेले होते. तसेच, २०२५ मधील प्रयागराज (उत्तर प्रदेश) महाकुंभ-मेळ्यातील चेंगराचेंगरीत तर दोन हजारांहून अधिक बळी गेले होते. तरीही, सामान्य जनता

‘‘धार्मिक महोत्सव, खेळ महोत्सव आणि ‘जनतेचं’ विसर्जन’’ Read More »

रोहिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण…???

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या रोहिणी निमसे या शहापूरच्या (मौजे-अल्यानी) १९ वर्षीय तरुणीचं घरी झोपेत मण्यार हा विषारी साप चावून शहापुरच्या उपजिल्हा इस्पितळात पुरेशा योग्य उपचाराअभावी (उदा. ICU Bed सह इतर वैद्यकिय-सुविधा व तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव) आज दुर्दैवी निधन झालं…. मुरबाड-शहापूरसारख्या ग्रामीण भागात, जेथे समृद्धी महामार्ग, काळू-शाई धरणे, एमआयडीसी कारखाने, निवासी व व्यापारी संकुले आदि मोठमोठे हजारो

रोहिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण…??? Read More »

‘विविधतेतून एकता’, हीच आमची राष्ट्रभाषा….

“आप भारत की राष्ट्रभाषा के बारे में जानना चाहते हैं, मुझे लगता है कि, भारत की राष्ट्रभाषा विविधता में एकता है!” …कानिमोझी स्वतःला ‘विश्वगुरु’ संबोधणारे (जगात कुणीही हिंग लावून फारसं कुणी विचारत नसतानाही) ‘ऑपरेशन-सिंदूर’बाबत भारताची बाजू मांडण्यासाठी व पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी…स्वतः कुठेही न फिरता (कारण, त्या कथित विश्वगुरुची विश्वासार्हता, सततच्या

‘विविधतेतून एकता’, हीच आमची राष्ट्रभाषा…. Read More »

प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था

खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आणि त्या मराठी-माणसांमधल्या प्रायः मराठी-बहुजनांना जागं करु पहाणार्‍यांची महाराष्ट्र-हितैषी परंपरा, ‘प्रबोधनकारां’सारख्या महापुरुषानंतर दुर्दैवाने बव्हंशी खंडीत झाली…त्यानंतर, मराठी-माणसाला तद्दन फसवणाऱ्या राजकीय कःपुरुषांची एक भली मोठी मांदियाळीच महाराष्ट्राच्या छाताडावर नाचू लागली…परिणामतः, महाराष्ट्राची सारासार ‘विवेकबुद्धी’ नष्ट होऊ लागली आणि त्याच्यावर येऊ घातलेल्या ‘भांडवली’ व्यवस्थेतल्या संकटांचं-आपत्तींचं (उदा. कंत्राटी-कामगार पद्धत वा आऊटसोर्सिग इ.) त्याला ‘आकलन’

प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था Read More »

शस्त्रसंधीनंतरचं कवित्व….

एखाद्या चित्रपटाची ‘सिक्वेल’ (वंशावळ) चालू असते…तसं मग, अचानक लक्षात येतं की, हा पठाणकोट-उरी-पुलवामा, असं वन-टू-थ्री झाल्यानंतरचा ‘चौथा एपिसोड’ होता; फक्त, त्यात तेरा हजार कि. मी. लांबवर रहाणार्‍या ‘परदेशी मित्राचा हस्तक्षेप’, हे एक ‘नवंनाट्य’ (किंवा हवंतरं ‘वगनाट्य’ म्हणा) कथानकाला जोडलं जातं…बाकी, सुरक्षिततेतल्या गंभीर त्रुटी वा गुप्तचरविभागाचं दारुण अपयश (पाॅलिश्ड भाषेत ‘सिक्युरिटी लॅप्सेस व इंटेलिजन्स फेल्युअर), हे

शस्त्रसंधीनंतरचं कवित्व…. Read More »