“रोज नऊ तास काम… कामगार धोरणात होऊ घातलेला बदल!”

“राममंदिर बांधू पहाणाऱ्या” नरेंद्र मोदी सरकारने, आता, एकदाचा “नऊच कशाला, रोज चोवीस तास काम” असा, “रावणाला साजेसा अत्याचारी रावणी-धोरण बदल करुन मोकळं व्हावंच आणि त्यांच्या पक्षाच्या झोळीत हजारो कोटी मुक्तहस्ताने ओतणाऱ्या उद्योगपतींच्या ऋणातून उतराई व्हावंच!!!
…..या निमित्ताने “मुँह में राम, बगल में रावण”, या नव्या म्हणीचा, झोपी गेलेल्या आणि झोपेतच प्रस्थापित पक्षांचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या समस्त कामगारवर्गाला थोडातरी अर्थ कळला, तरीही आम्ही स्वतःला धन्य समजू!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)