प्रबोधनकारांनी दाखवलेला मार्ग आणि आजची मराठी अवस्था

खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आणि त्या मराठी-माणसांमधल्या प्रायः मराठी-बहुजनांना जागं करु पहाणार्‍यांची महाराष्ट्र-हितैषी परंपरा, ‘प्रबोधनकारां’सारख्या महापुरुषानंतर दुर्दैवाने बव्हंशी खंडीत झाली…त्यानंतर, मराठी-माणसाला तद्दन फसवणाऱ्या राजकीय कःपुरुषांची एक भली मोठी मांदियाळीच महाराष्ट्राच्या छाताडावर नाचू लागली…परिणामतः, महाराष्ट्राची सारासार ‘विवेकबुद्धी’ नष्ट होऊ लागली आणि त्याच्यावर येऊ घातलेल्या ‘भांडवली’ व्यवस्थेतल्या संकटांचं-आपत्तींचं (उदा. कंत्राटी-कामगार पद्धत वा आऊटसोर्सिग इ.) त्याला ‘आकलन’ होणं अशक्यप्राय बनलं…साप समजून तो भुई थोपटू लागला व आपापसात लढू लागला आणि तिकडे महाराष्ट्रभरात भांडवलदार व त्यांच्या राजकीय-प्रशासकीय ‘दलाल’ सापांची पिलावळ प्रचंड वेगाने वाढू लागली…’नितीमत्ता’ नावाचं त्याचं एकमेव ‘भांडवल’ उतरणीला लागलं… ‘उत्सव-प्रियता’ हा मराठी माणसाचा ‘वीक पॉईंट’ आहे, हे जाणून ढोंगी राजकारणी महाराष्ट्राला सार्वजनिक गणेशोत्सव, महापूजा, दहीहंड्या, गरबे, महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या आदींच्या फाजिल उत्सवप्रियतेची ‘अफुची मात्रा’ पाजू लागले…त्या घातकी उत्सवी-महोत्सवी ‘मराठी-ग्लानी’त व अफुच्या नशेतच उत्तरभारतीय उंदीर-घुशींनी महाराष्ट्र पोखरुन टाकला आणि महाराष्ट्राची ‘सरस्वती’ गुजराथच्या ‘लक्ष्मी’ची कधि ‘दासी’ बनली, ते महाराष्ट्राला आकळलंच नाही…त्यातूनच, महाराष्ट्राची ‘महालक्ष्मी’ (धनसंपत्ती-जमीनजुुमला) व ‘राजलक्ष्मी’ (राजकीय सत्ता) जैन-गुजराथी-मारवाड्यांच्या घरात पाणी भरु लागली, “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्ती महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाच्या मुळावर उठली आणि आपल्या हक्काच्या महाराष्ट्रातच मराठी-माणूस ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला”!
…जरा फक्त विचार करुन तर बघा की, मराठी-माणसाच्या तोंडचा ‘घास’ हिरावू पाहणाऱ्या सर्वपक्षीय राजकारणी-उद्योगपती-व्यापारी-नोकरशहांचे षडयंत्र, आज ‘प्रबोधनकार ठाकरे’ (केशव सीताराम ठाकरे) हयात असते; तर, कशाप्रकारे महाराष्ट्राला गदागदा हलवून त्यांनी, अत्यंत कठोर व ज्वलंत शब्दात, ते उघडं पाडलं असतं!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)