दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं,

दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं,
“अशा बाहेरच्या कृत्रिम लखलखाटाने अवघ्या जगण्याचा ‘कोंडमारा’ झालेल्या मराठी-घरांमध्ये…’दीप जवळी घेता पाही, अवघा प्रकाश त्याच्या ठायी’, असा आनंद व सुखासमाधानाचा, अंशाने तरी ‘प्रकाश’ पडू शकेल काय?
…गावपाड्यांच्या व नगरं-उपनगरांच्या १०’ × १०’ च्या कोंडवाड्याला, या लखलखाटाचा खरोखरीच संसर्ग जडेल काय??
…तो लक्षदिपांचा लखलखाटही कदाचित; ज्यांना, आम्ही ‘मुं.ठा.पु रा.ना’, म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर…असं संबोधतो; ती, मुंबईसह महाराष्ट्रातली सगळी मोक्याची शहरं बळकावून बसलेल्या, जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारवर्गाच्या पैशाच्या बळावर तर झालेला नसावा ना?
‘काट्याने काटा काढता येतो’ हे ठीक…पण, ज्यांनी महाराष्ट्र लुटून सामान्य मराठी-घरांमध्ये अंधार पसरवलाय, त्यांच्याच देणगीच्या पैशाने मराठी-घराघरांमध्ये ‘प्रकाश’ व्हायची अपेक्षा; म्हणजे, ‘अंधाराकडून अंधार नाहिसा करण्याची अपेक्षा’, नव्हे काय???
…थोडक्यात, हा ‘दिपोत्सव’, त्या थोड्याथोडक्या समृद्ध ‘उच्चमध्यमवर्गीय’ मराठी-घरांचं प्रतिनिधित्व करतो…जो ‘स्वांत सुखाय’ जगणारा आहे; तसेच, सध्याच्या रक्तपिपासू-निर्मम-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’चा (Vampire-State System) ‘लाभार्थी’ आहे…ज्याच्या जगण्यात रोजच दिवाळी आहे व जो प्रस्थापित राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी किंवा काॅर्पोरेटीय-व्यवस्थापकीय क्षेत्रातला उच्चशिक्षित वर्ग म्हणून गणला गेलेला आहे…आणि, ज्याला सुकाओला दुष्काळ, नापिकी यामुळे वा ‘हमीभावा’विना तडफडणार्या शेतकऱ्यांच्या…अथवा कंपन्या-कारखान्यांमधून ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या दुष्टचक्रात अडकवल्या गेलेल्या अभागी जीवांच्या डोळ्यातल्या अश्रुंशी, त्यांच्या घरातल्या अंधाराशी बिलकूल देणंघेणं नाही!
अयोध्येतल्या दिपोत्सवात ‘राम की पैडी’ येथे ८० हजार दिव्यांनी सजवलेली रांगोळी आणि शिवतीर्थावरचा दिपोत्सवी-लखलखाट; यात तत्त्वतः कुठलाच फरक नाही…उत्तरेतल्या काय किंवा महाराष्ट्रातल्या काय, एकूणच जनसामान्यांच्या जगण्याशी फारकत घेतलेल्या या दोन्ही बाबी, धनदांडग्यांच्या उंच महालांशी मात्र, उत्तम सूत जमवून आहेत!”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)