विशेष लेख

…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते !!!

“कुपोषणानं मरणासन्न होऊन, ऊन्हातान्हात निपचित पडलेली एक लहानगी ‘मुलगी‘, कधि मरतेय आणि कधि आपण तिचा फडशा पाडतोय, यासाठी टपून बसलेले एक गिधाड”, ….सुदान देशामधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, असं प्रत्ययकारी दृश्य कॅमेऱ्यात अतिशय कौशल्याने बंदिस्त करणाऱ्या ‘केव्हिन कार्टर’ला, त्या फोटोबद्दल पत्रकारितेतील आंतरराष्ट्रीय सन्मानाचं ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळालं खरं… पण, या सन्मानाचा आनंद काही त्याला, फार काळ उपभोगता […]

…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते !!! Read More »

‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी ‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ या पुण्यात्म्यांच्या प्राणांची आहुती…

‘संत निगमानंदजीं‘ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद‘ यांनी ‘गंगामैय्ये‘च्या रक्षणासाठी नुकतीच प्राणांची आहुती दिली… त्यानंतर, ‘संत गोपालदास‘, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत… त्यांची दिव्य-तेजस्वी प्राणज्योत मालवायला, आता काळाच्या फक्त एका हलक्या फुंकरीची गरज तेवढीच उरलीय… ती ही ‘गरज‘, येत्या काही दिवसात, या देशातल्या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”कडून (Vampire

‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी ‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ या पुण्यात्म्यांच्या प्राणांची आहुती… Read More »

आज ‘नथुराम’ असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती…..

“नमामि गंगे” आणि “माँ गंगामैय्याने मुझे यहाँ बुलाया है….” असं म्हणतं, उ. प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी, केवढे महान “गंगाभक्त” नव्हे काय? अहो, महाभारतातल्या गंगापुत्र पितामह भीष्म वा कुंतीपुत्र  दानशूर कर्णाची ‘गंगाभक्ती’ही थिटी पडावी… एवढी नरेंद्र मोदींची ‘गंगाभक्ती’ खरोखरीच अगम्य-अवर्णनीय नव्हे काय?? दिवाळीच्या मुहूर्तावर गंगेला लाखो तेलाचे दीप अर्पण करणारे मोदी पहा आणि गंगेच्याच

आज ‘नथुराम’ असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती….. Read More »

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???……

दहा वर्षांची घुसमट, एकदाची निर्धाराने संपवत, तनुश्री दत्ताने नाना पाटेकराला जमिनीवर पाठ टेकवायला लावलीय…. या तिच्या हिंमतीबद्दल तिचं कौतुक करावं, तेवढं थोडचं! सर्वसाधारणपणे, भारतीय समाजातीलच काय; पण, अगदी प्रगत राष्ट्रांमधील (अगदी हाॅलिवूडच्या ‘मर्लिन मन्रोसारख्या ख्यातनाम नट्यासुद्धा) महिला वा महिला कलाकार, आपल्या लैंगिक शोषणाबद्दल वा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलायला सहजी तयार होत नाहीत (त्यातलं सध्या भयंकर गाजणारं

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???…… Read More »

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं……

संजय निरुपमा, मुंबई-महाराष्ट्र आमच्या जीवावर चालतो, या उद्दाम आणि फुकाच्या वल्गना तू आता एकदम बंद कर… तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… बघूया, त्यामुळे, मुुंबईसह  असलेला “शिवबा-संतां”चा महाराष्ट्र, तुझ्या भाकिताप्रमाणे कोसळतो की, तुम्ही युपी-बिहारवाले भीकेला लागता, ते एकदाचे समजेल !!! सालं, आमच्या जीवावर जगायचं आणि आम्हालाच

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… Read More »

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!!

‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष म्हणून नव्हे; तर, या देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मला अशा मोठ्या राजकीय व्यक्तिंच्या निधनापश्चात, काही साधेसुधे प्रश्न सतावत रहातात. प्रश्न असा…. ज्याची गेले काही दिवस, नंतर पुढे कित्येक महिने, वर्षे…. विविध दूरदर्शन वाहिन्यांवरुन साग्रसंगीत, रसभरीत (अगदी अंतःकरण गदगदून टाकणारी) चर्चा चालू राहील…. ती स्व. अटल बिहारी वाजपेयींची ‘संवेदनशीलता’, ही अशी विशिष्ट कोंदणातच

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!! Read More »

लंगडे विकृत नेतृत्त्व आणि लंगडणारा समाज (गिरीदंतजातककथा)

{ही गिरीदंतजातककथा, मला ‘संजय पगारे’ (८९२८४५५१०५) या एका जाज्वल्य बुध्द धम्म प्रसारकाने व्हाॅट्स्अॅपवर पाठवली. पण, ही कथा एवढी मर्मग्राही आहे आणि तिचा संदेश एवढा व्यापक व मर्मभेदी आहे…. की, तो प्रखर संदेश, वर उल्लेखल्याप्रमाणे फक्त, अनुसूचित जातीजमातींपुरताच मर्यादित नसून, महाराष्ट्रातील तमाम ‘मराठी माणसां’ना तंतोतंत लागू आहे.} म. फुले, टिळक, सावरकर, आंबेडकर, सेनापती बापट, एस.एम. जोशी,

लंगडे विकृत नेतृत्त्व आणि लंगडणारा समाज (गिरीदंतजातककथा) Read More »

“विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास’…

भारतीय गव्हाचं कोठार, एम्. एस्. स्वामीनाथनकृत हिरव्या क्रांतिचा अग्रदूत, आधुनिक भारतातल्या मंदिरां‘चं राज्य (इति पंडित नेहरु…) म्हणजेच, अवाढव्य मोठ्या धरणांचं राज्य… वगैरे वगैरे ‘विशेषणे‘ मिरवणारं ‘पंजाब राज्य‘, स्वातंत्र्यापश्चात ‘घडता पंजाब‘पासून ‘बुडता-बिघडता पंजाब‘ असा प्रवास करता कसं झालं, हा एक मन विषण्ण करणारा “विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास‘ आहे…… पूर्वीच्या सुखीसमाधानी पंजाबला जणू,  एम्. एस्. स्वामीनाथनकृत

“विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास’… Read More »

“मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच???”

“दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो”, अशी वैश्विक प्रार्थना करीत, अवघ्या प्राणीमात्रांसाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान‘ मागितलं…. तेवढ्यावर न थांबता, “अमृतातेहि पैजासी जिंके…. माझा मराठीची बोलू कौतुके”, असा गर्वोन्नत छातीनं आपल्या मराठी भाषेचा उल्लेख केला…. त्या, आमच्या ‘मायमराठी‘ची, तिच्याच महाराष्ट्रात शब्दशः ससेहोलपट सुरु असताना, “गुजराथमध्ये काय घडतयं, ते जरा नीट डोळे उघडून पहा”! अवघ्या भारतातल्या

“मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच???” Read More »

“नूतन वर्षाभिनंदन….!!!”

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथमच (ता. मुरबाड, मौजे-साखरे) नैसर्गिक वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाची केलेली शेती आणि पूर्णतः ‘रसायनमुक्त’ वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाचं ‘गुऱ्हाळ’ चालवून जागीच केलेली ‘गुळा’ची निर्मिती….. शेतीविषयक एक ऐतिहासिक घटना !!! ‘भाताचं कोठार’ (विशेषतः पूर्वीचा वाडा तालुका) वगैरे काही बाबी वगळता, आजवर ठाणे जिल्ह्यात शेतीविषयक फारसं उल्लेखनीय असं काही घडलेलं नाही. त्यामुळे, ठाणे ग्रामीण

“नूतन वर्षाभिनंदन….!!!” Read More »