राजकारण

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र

(ठाण्यातील प्रख्यात रेडिऑलाॅजिस्ट असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राने, कुणी आनंद देवधर नावाच्या भाजपाई-संघीय प्रणालीत घोटून तयार झालेल्या व्यक्तिचा, विद्वेषपूर्ण-विखारी संदेश पाठवला, ज्यात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त स्टुडिओमध्येच होती की काय? असा सात्विक संताप जागा करणारा क्षुद्रवृत्तीचा प्रश्न होता… व त्यावर, व्यक्त होण्याची मला विशेषत्वाने विनंती मित्राने केली…म्हणूनच, हा संयुक्त संदेश-प्रपंच!) मी सुरुवातीलाच […]

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र Read More »

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी…

फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर नव्हतंच…अशातच, चीनने पाठीत खंजीर खुपसत भारतावर १९६२मध्ये हल्ला केला! देशांतर्गत संसाधनांची मोठी वानवा होती. यास्तव, पं. जवाहरलाल नेहरुंनी आर्त स्वरात भारतीय जनतेला मदतीची हाक दिली. तेव्हा, त्यांची मुलगी

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी… Read More »

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का?

एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. . १) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का? Read More »

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर….

“जेल जाने के बाद, उन्हे जंगल का जीवन याद आ रहा होगा”, ‘गोदी-मिडीया’तल्या एका सवर्ण अँकरने असा फुत्कार टाकणं…म्हणजे द्रौपदी मुर्मू, या ‘आदिवासी’ महिलेला राष्ट्राध्यक्षा बनवल्या जाण्यातली ‘भाजपाई-नौटंकी’, भारतीय जनतेसमोर उघडी पडणं! बँकांचे हजारो कोटी लुटून विदेशी पळून गेलेल्या व देशात राहून देश लुटणाऱ्या धनदांडग्या गुजराथ्यांच्या केसालाही धक्का न लावणारी ‘गुजराथी-लाॅबी’… हाती सबळ पुरावा नसतानाही

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »

आधी बैल घालवायचा आणि मग, झोपा करायचा (ते ही केल्यासारखं नाटक)… ‘बाॅम्बे’चं मुंबई केलं…पण, त्याचं सरतं ‘मराठीपण’ आणि वाढतं ‘गुजराथीपण’ थांबेना!

“महाराष्ट्रातून (म्हणजे, मुंबईतून हो) तुमचा बोजाबिस्तरा गुंडाळून तुमच्या गुजराथला चालते व्हा”, असा मोठ्या राणाभीमदेवी थाटात (“मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर”, ‘पॅटर्न’चा तो थाट) आमचे मराठी नेते मुकेश अंबानींना फुसका ‘आवाज’ देताना पाहून…मुकेश अंबानी मनात हसत म्हणत असतील की, “हू तो गुजराथमाच छू, तमे समझता नथी?” …ही मुंबई, हे ठाणे शहर (आणि, हळूहळू अशीच पुणे,

आधी बैल घालवायचा आणि मग, झोपा करायचा (ते ही केल्यासारखं नाटक)… ‘बाॅम्बे’चं मुंबई केलं…पण, त्याचं सरतं ‘मराठीपण’ आणि वाढतं ‘गुजराथीपण’ थांबेना! Read More »

“कोण कोणासोबत जाईल, हे सांगणं खूप कठीण आहे”, या बहेनजींच्या उद्गारानंतरचा ‘मायावती इफेक्ट’, काय चमत्काराची ‘राजकीय-नौटंकी’ घडवू शकतो; ते जरा पहाच…

‘स्वप्नात हत्ती दिसणं’, हे सर्वसाधारणपणे भारतीय जनमानसात ऐश्वर्यसंपन्नता-सत्तावैभव, याचं निदर्शक मानलं जातं. मात्र, वरील ‘मायावी’ उद्गारांमुळे, ‘बसपा’चा ‘हत्ती’ मोदी-शहांच्या स्वप्नात येऊ लागलाय…मात्र, तो आलाय, २०२४ च्या लोकसभा-निवडणुकीसंदर्भात सत्तावैभवाच्या शकुनाऐवजी, एक अपशकून बनूनच! …तिथून पुढे घडलेला, ताजा घटनाक्रम पाहिला की, एखाद्या सुजाण-सज्जन भारतीय नागरिकाच्या मनात-अंतःकरणात एकतर संतापाची तिडीक जावी किंवा त्याच्यावर, स्वतःच्याच कपाळावर हात मारुन घेण्याची

“कोण कोणासोबत जाईल, हे सांगणं खूप कठीण आहे”, या बहेनजींच्या उद्गारानंतरचा ‘मायावती इफेक्ट’, काय चमत्काराची ‘राजकीय-नौटंकी’ घडवू शकतो; ते जरा पहाच… Read More »

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!!

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!! सर्वप्रथम, २० हजार कोटींचा ‘सेंट्रल-व्हिस्टा’ प्रकल्प (तथाकथित अमृतकाळात, सगळी ब्रिटीश व मोगल-राजवटीतली नावं बदलली जात असताना, ‘सेंट्रल-व्हिस्टा’ हे इंग्रजी नाव ठेवलं जातं किंवा गुजराथच्या ‘अहमदाबाद’चं नाव बदललं जात नाही, हे विशेषच) बांधणाऱ्या भाजपाई ‘वास्तुविशारदा’ला तुरुंगात टाका, ज्याने जेमतेम ६

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!! Read More »

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल

सर्वोच्च-निकालानंतर आता काश्मीरचा, इथून पुढे फक्त पहात रहा, नवा प्रवास….”नैसर्गिक-सौंदर्याने विनटलेलं व काश्मिरियतचा सांस्कृतिक-वारसा लाभलेलं पृथ्वीवरचं नंदनवन” ते “बड्या भांडवलदारांची, बड्या भांडवलदारांकडून, बड्या भांडवलदारांसाठी उभारली गेलेली कृत्रिम-अनैसर्गिक सुवर्णलंका”! ही ‘सुवर्णलंका’ असेल; स्थानिक जनसामान्यांवरील अन्याय-शोषण-अत्याचारांनी भरलेली…रावणासारख्या अविवेकी, नीतिशून्य, सैतानी ‘विकासा’ची कास धरत, “मुँह में राम और बगल में रावण”, या कावेबाज राजनितीचा हात धरुन उभारलेली! ———————————————————-

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल Read More »

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे…

विविध कामगार-संघटना आणि ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन गेली दोनतीन दशके आम्ही सातत्याने, ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चातच्या आधुनिक रक्तपिपासू-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या (Vampire-State System) ‘बकासुराचा प्राण’… ‘कंत्राटी-कामगार पद्धत, आऊटसोर्सिग’ सारख्या अमानुष-घृणास्पद शोषण करणाऱ्या, भांडवली-गुहेमध्ये दडलेल्या ‘पिंजऱ्यातील पोपटा’त आहे… अशी मांडणी करीत आलेलो आहोत! ‘नफ़रत छोड़ो, भारत जोड़ो’चे प्रणेते व ‘भाजपा-संघ’कृत “विद्वेषी बाजारात प्रेमाचं दुकान” उघडणारे व अन्याय-अत्याचार-शोषणाग्रस्त

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे… Read More »

“हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत…शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही…” इति, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)

… ‘मी परत येईन, मी परत येणार’ फेम उपमुख्यमंत्र्यांच्या वरील उद्गारासंदर्भात, त्यांना समस्त महाराष्ट्रीय जनतेकडून काही विचारणा…. १) ‘शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत’, याचा गर्भित अर्थ, “आमच्या मातृसंस्थेची शिकवणच मुसोलिनीच्या धर्तीची ‘काळी टोपी’वाली (कशी, ते वाचकांनीच जाणावं)…तेव्हा, विचारतो कोण, तुमच्या असल्या षंढ-अहिंसक आंदोलनांना?” असा घ्यायचा का? २) “हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत”, याचा

“हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत…शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही…” इति, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) Read More »