आरोग्य

रोहिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण…???

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या रोहिणी निमसे या शहापूरच्या (मौजे-अल्यानी) १९ वर्षीय तरुणीचं घरी झोपेत मण्यार हा विषारी साप चावून शहापुरच्या उपजिल्हा इस्पितळात पुरेशा योग्य उपचाराअभावी (उदा. ICU Bed सह इतर वैद्यकिय-सुविधा व तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव) आज दुर्दैवी निधन झालं…. मुरबाड-शहापूरसारख्या ग्रामीण भागात, जेथे समृद्धी महामार्ग, काळू-शाई धरणे, एमआयडीसी कारखाने, निवासी व व्यापारी संकुले आदि मोठमोठे हजारो […]

रोहिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण…??? Read More »

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”…

(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..) केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते,

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… Read More »

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…???

‘करोना महारोग’ बराचसा अनावश्यक हवाईप्रवास करणाऱ्या श्रीमंतांनी विमानातून पसरवला आणि त्याचे खाली जमिनीवर भयंकर ‘भोग’ कोण भोगतोय…. तर, “विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर” तसं, डोक्यावर गाडगीमडगी घेऊन रस्तोरस्ती मैलोगणिक ऊन्हातान्हात फिरणारा तो गोरगरीब भोगतोय….. या ‘मरणयातनां’पेक्षा प्रत्यक्ष ‘मरण’ बरं… अशी, आजची सामान्य लोकांची मनस्थिती आहे! केवढं हे, कमालीचं क्रौर्य? क्रौर्याने तर या ‘लाॅकडाऊन’मध्ये जणू, कळसच गाठलाय… नोटबंदीतही

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…??? Read More »

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा….

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. ही ‘‘धर्मराज्य पक्षा’’ची स्थापनेपासूनची ठाम मागणी आहे! दर्जेदार शिक्षण (ते ही मातृभाषेतूनच) तर, मोफत मिळायलाच हवं; पण, ‘आरोग्यसेवा’ही एकतर मोफत अथवा किमानपक्षी, वाजवी दरात (विशेषतः, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासारख्या अत्यंत महागड्या व खर्चिक आजारपणासंदर्भात) उपलब्ध करुन देण्याची सार्वजनिक-व्यवस्था निर्माण केली गेलीच पाहीजे व

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. Read More »

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी

मोहनदास करमचंद गांधी, हे व्यक्तिमत्त्व यासाठी जगात ‘महान’ आणि तो यासाठी ‘महात्मा’…. कारण, अलिकडच्या काळातील हा एकमेव भारतीय, ज्याची ‘प्रज्ञा’ जगण्याच्या सगळ्याच संदर्भांच्या ‘आसा’ला भिडलेली होती ! …….अध्यात्म, समाजकारण, राजकारण, शाश्वत स्वरुपाची निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैली-अर्थशास्त्र-विकासाचं प्रारूप, ‘ग्राहको देवो भव’ मानणारी उद्योग-व्यापार नीति, शाश्वत नैसर्गिक-शेती, निसर्गोपचार, ‘रामराज्य, अंत्योदय, अस्पृश्यता-निर्मूलन, अहिंसा, मौनव्रता”‘चा पुरस्कार, ‘पहने सो कांते और कांते

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी Read More »

प्राणायाम

प्राणायामाच्या दिवसभरातील सर्वोत्तम वेळा (सूर्योदयापूर्वी माध्यान्ही स. १० ते दु. १२, वा. पर्यंत सूर्यास्तापूर्वी व मध्यरात्रीचा समय, अशा एकूण ४ वेळा) व संपूर्ण वर्षभरातील सर्वोत्तम कालावधि (वसंत ऋतु व शरद ऋतु हे दोनच) प. पू. पतंजली ऋषिंनी ‘योगदर्शनात’ वर्णिलेला असला, तरीही प. पू. रामदेवस्वामींनी ‘सप्त-प्राणायाम प्रणालीचे’ आमजनतेसाठी खुलं प्रसारण करताना, गुरूपदेश (प. पू. शंकरजी महाराज)

प्राणायाम Read More »

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि ||

प. पू. रामदेवस्वामींच्या प्रारंभपर्वातील ‘योगशिष्य’ होण्याचं भाग्य मला लाभण्यापूर्वी एक सर्वसामान्य ‘योग साधक’ या पवित्र नात्यानं भारतात (विशेषत: महाराष्ट्रात) प्रचलित असलेल्या अनेकानेक योगगुरूंच्या मार्गदर्शनाचा मी लाभ घेता झालो! त्याव्दारे मला व्यक्तिगत स्तरावर झालेल्या बहुआयामी सकारात्मक परिणामांचा त्यांच्या गति आणि व्याप्तिचा त्यात अंतर्भाव असलेल्या यौगिक क्रियांची क्लिष्टता व श्रम, राबवलेल्या व्यवस्थापन पध्दती याचा तौलनिक अभ्यास करत

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि || Read More »