भ्रष्टाचार आणि घोटाळे

सरकार, प्रशासन, खाजगी क्षेत्र, किंवा कोणत्याही संस्थांतील भ्रष्टाचार, वित्तीय घोटाळे, गैरव्यवस्थापन, कंत्राट घोटाळे, पारदर्शकतेचा अभाव, आणि सत्तेचा गैरवापर यावर प्रकाश टाकते.
यामध्ये तथ्याधारित लेख, विश्लेषण, वृत्तांचा आढावा, जनहित याचिका, आणि जनतेचा पैसाच कसा लुबाडला जातो याविषयी माहिती समाविष्ट केली जाईल.

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!!

नुकताच, पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे माहिती-अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वसूली करणा‍ऱ्या IRB कंपनीची जी ‘पोलखोल’ केलेली आहे….. त्याचा अंदाज यापूर्वीच ‘न’ येण्याएवढी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही. हा टोल नांवाचा ‘जिझिया कर’ वसूल करणारी IRB कंपनी ही, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हाताशी धरुन पडद्याआड ‘काळेधंदे’ करणारी ‘कॉर्पोरेट-ठग’ आहे….. हे ही महाराष्ट्रातली जनता […]

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!! Read More »

“रोगापेक्षा इलाज भयंकर”

गेल्या २४ तासात, एका पाठोपाठ एक…. प्रथम डिझेल व एल्.पी.जी. गॅस सिलिंडरच्या भरमसाठ दरवाढीपश्चात, किरकोळ विक्री, विमान वाहतूक (उथळ व उधळ्या विजय मल्ल्याच्या बुडीत ‘किंगफिशर’ एअरलाईन्स्च्या मदतीसाठी) व प्रसारणात परकीय भांडवलाला मुक्तव्दार; तसेच काही नवरत्न कंपन्यांच्या निर्गुंतवणूक करण्याच्या दिवाळखोर धोरणाचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध करीत आहे. हा, “रोगापेक्षा इलाज भयंकर” असून ‘रोग्या’ला मारून ‘डॉक्टर’ला जगवणारी

“रोगापेक्षा इलाज भयंकर” Read More »

अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा…

लाल, बाल, पाल या त्रिमूर्तिपश्चात स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सेनापती बापट, चिंतामणराव देशमुख अशा एकेक दिग्गज हिमालयाच्या उंचीच्या राजकीय नेतृत्वाची मांदियाळी या भारत देशाला लाभली आणि त्यानंतर अकस्मात ‘अंधारयुग’ सुरू झाले. ‘मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला’ आणि ‘साध्या टेकडीएवढीचं काय…’ अहो रस्त्याच्या स्पीडब्रेकर

अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा… Read More »