Rajan Raje

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली……

“सावित्रीमाई पाहुणी आली, गेली रस्त्यावरुन वाहून… भिंत खचली, कठडा तुटला, पूल अर्धा गेला वाहून…. जाता जाता, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले…. पती-प्राणार्थ झुंजणारीनं, शेकडों जीवांना यमसदनी कसे धाडले….” १९२८ साली ब्रिटीशांनी बांधलेला (मे-२०१६ रोजीच्या रिपोर्टनुसार शासन दरबारी उत्तम स्थितीतला पूल, अशी आश्चर्यकारक नोंद असलेला) सावित्री नदीवरचा पूल वाहून जातो आणि कागदाच्या होडीसारख्या वरुन जाणाऱ्या […]

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली…… Read More »

ब्रेक्झिटचं कवित्व……

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक व अमेरिकन ‘गन-लाॅ‘ बदलण्याची धामधूम, फ्रान्समध्ये ‘कामगार-कायदे‘ बदलावरुन तापलेलं वातावरण आणि युरोकप-२०१६ फूटबॉल-स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ७५% ब्रिटीश नागरिकांनी मतदानात भाग घेऊन, निसटत्या बहुमताने का होईना (५१.९%  बाजुने तर, ४८.१ विरोधात) पण, ‘ब्रेक्झिट‘च्या (British Exit from European Union) बाजूने दि. २३ जून-२०१६ रोजी कौल दिला आणि या ‘अस्मितेच्या राजकारणा‘चा (Identity Politics) पहिला ‘बळीचा बकरा‘

ब्रेक्झिटचं कवित्व…… Read More »

रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेचा “डोंबिवली-रक्तसंबंध” ……

“डोंबिवलीतील कालपरवाच झालेला ‘प्रोबस’ या रसायन-औषधनिर्माण कंपनीतील भीषण स्फोट, हा केवळ एक ‘अपघात’ होता का ? २६ मे-२०१६ ला दुपारी अकराच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीत जे घडलं तो ‘अपघात’ नव्हता; तर, या ‘शोषक-रक्तपिपासू व्यवस्थे’ने (Vampire-State) पैशाच्या हव्यासापोटी केलेल्या गैरव्यवहारांच्या मालिकेतून अटळपणे घडणारा एक ‘घातपात’ होता ! ‘अपघात’ असे घडत नसतात… अपघातांच्या मागे कधि फारसा कार्यकारणभाव नसतो….

रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेचा “डोंबिवली-रक्तसंबंध” …… Read More »

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ???

‘संविधान-मोर्चा’ या एका वैचारिक घुसळणं व अभिसरण करणार्‍या एका चांगल्या ग्रुपमध्ये मला खालील प्रश्न विचारण्यात आला होता…. प्रश्न : ‘धर्मराज्य पक्षा’च्या नांवात असलेलं व त्या पणाला अभिप्रेत असलेलं…. “धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? माझं वरील प्रश्नाला थोडक्यात उत्तर : ‘धर्मराज्य’ म्हणजे काय…. हा, अनेकवेळा, अनेकप्रसंगी मला विचारला गेलेला एक चांगला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नातच

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? Read More »

‘अक्षय्य-तृतीये’चं महत्त्व…. “सोनं खरेदीसाठी नव्हे; तर, मातीतून ‘सोनं’ पिकवण्यासाठी !!!”

‘अक्षय्य-तृतीये’सारख्या मुहूर्तांच्या दिवशी चढ्या भावाने सोनारांकडून (हल्ली त्यांना लब्धप्रतिष्ठीत भाषेत ‘ज्वेलर्स’ म्हटलं जातं…. भले मग, ते सर्वसाधारण श्रमिक-कामगारांसारखेच रस्त्यावर उतरून ‘संपा’सारखी आंदोलने भले का करेनात…. अर्थात, ‘कंत्राटी-कामगार’ पद्धतीसारखी ‘गुलामगिरी’ व ‘नव-अस्पृश्यता’ मौजूद असताना व अत्यंत तुटपुंजे पगारमान असतानाही, हल्लीचे ‘गळपटलेले’ वीर्यहिन व थंडगार कामगार, संपाचा साधा विचारही करण्यास धजावत नाहीत, ही बाब अलाहिदा !) सोनं

‘अक्षय्य-तृतीये’चं महत्त्व…. “सोनं खरेदीसाठी नव्हे; तर, मातीतून ‘सोनं’ पिकवण्यासाठी !!!” Read More »

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी

मोहनदास करमचंद गांधी, हे व्यक्तिमत्त्व यासाठी जगात ‘महान’ आणि तो यासाठी ‘महात्मा’…. कारण, अलिकडच्या काळातील हा एकमेव भारतीय, ज्याची ‘प्रज्ञा’ जगण्याच्या सगळ्याच संदर्भांच्या ‘आसा’ला भिडलेली होती ! …….अध्यात्म, समाजकारण, राजकारण, शाश्वत स्वरुपाची निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैली-अर्थशास्त्र-विकासाचं प्रारूप, ‘ग्राहको देवो भव’ मानणारी उद्योग-व्यापार नीति, शाश्वत नैसर्गिक-शेती, निसर्गोपचार, ‘रामराज्य, अंत्योदय, अस्पृश्यता-निर्मूलन, अहिंसा, मौनव्रता”‘चा पुरस्कार, ‘पहने सो कांते और कांते

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी Read More »

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!”

‘धर्मराज्य पक्ष’…. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजन राजे’….. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय नेता’…. ज्यानं, आपल्या देशात (विशेषतः, महाराष्ट्रात) थैमान घालणाऱ्या, आधुनिक-व्यवस्थेतील “गुलामगिरी व नव-अस्पृश्यते”प्रमाणे असणाऱ्या “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेविरुद्ध, गेल्या २५-३० वर्षांपासून “धर्मयुद्ध” पुकारलेले आहे ! जशा, वृक्षाच्या आधाराशिवाय ‘वेली’ जगू व वाढू शकत नाहीत…. तशीच अवस्था, कामगार-कर्मचारी चळवळीची असल्याने, तिला सदैव ‘राजकीय आधारवडा’ची गरज

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!” Read More »

नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम

“नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम रद्द करण्यासाठी, ‘बंगळुरु’मधील तयार कपड्यांच्या कारखान्यातले ‘दक्षिण भारतीय’ कामगार संतापानं पेटून उठत रस्त्यावर उतरले….. प. बंगालची सद्यस्थितीतील चालू निवडणूक-प्रक्रिया आणि तामिळनाडू, केरळ, पाँडेचरीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेदरलेल्या, बड्या भांडवलदारांचे हस्तक असलेल्या मोदी सरकारने तत्काळ घेतली माघार”….. एक कालपरवाची मोठी बातमी ! दक्षिण भारतातलं साध्या ‘पीएफ’ नियम-बदलाबाबतच

नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम Read More »

‘कार्बन-टॅक्स’ संकल्पना

नेदरलँडमध्ये, कमीतकमी कार्बन ऊत्सर्जन करणार्‍या, अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून, वर्ष-२०२५ पर्यंत पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या वाहनांवर बंदीचा प्रस्ताव ! रस्त्यावर धावणारी वाहने ही केवळ, इलेक्ट्रिक, हायब्रीड किंवा हायड्रोजनवर चालणारी ‘ग्रीन वाहने’ असतील, असं या प्रस्तावात म्हटलेलं आहे. भारताचा सख्खा शेजारी असलेल्या भूतान या देशात, यासंदर्भात फार मोठी मजल याअगोदरच मारण्यात आलेली आहे.

‘कार्बन-टॅक्स’ संकल्पना Read More »

“कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !”

“भारतीय राज्यघटनेत, ज्या अनेक त्रुटी राहून गेलेल्या आहेत, त्यातील एक महत्त्वपूर्ण त्रुटी म्हणजे, केंद्र सरकारने कुठल्याही राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यासंदर्भातील घटनेतील कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !“ याचाच, गैरफायदा घेऊन ‘हुकूमशाही वृत्ती’च्या स्व. इंदिरा गांधींनी अनेकवेळा (आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत वर्ष १९६६-६७ या दहा वर्षात तब्बल ३९ वेळा राज्यघटनेतील 356 कलमाचा गैरवापर केला)

“कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !” Read More »