सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली……
“सावित्रीमाई पाहुणी आली, गेली रस्त्यावरुन वाहून… भिंत खचली, कठडा तुटला, पूल अर्धा गेला वाहून…. जाता जाता, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले…. पती-प्राणार्थ झुंजणारीनं, शेकडों जीवांना यमसदनी कसे धाडले….” १९२८ साली ब्रिटीशांनी बांधलेला (मे-२०१६ रोजीच्या रिपोर्टनुसार शासन दरबारी उत्तम स्थितीतला पूल, अशी आश्चर्यकारक नोंद असलेला) सावित्री नदीवरचा पूल वाहून जातो आणि कागदाच्या होडीसारख्या वरुन जाणाऱ्या […]










