Rajan Raje

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’ करुन, मोदी सरकारच्या मर्जीतल्या ‘विशिष्ट जमाती’ला आणि ‘जमात प्रमुखां’ना (त्यात, गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकडो-हजारो कोटी ‘दान’ करणारी, सत्ताधाऱ्यांची बडी उद्योगसमूह मित्रमंडळी आलीच) अगोदरपासूनच कळविण्यात आलेला होता का??? {वाचा…. http://wap.business-standard.com/article/economy-policy/the-mystery-behind-the-rs-3-lakh-crore-deposits-in-15-days-116120800926_1.html} ‘बिझिनेस स्टँडर्ड’ या जगविख्यात अर्थशास्त्रीय मासिकाने केलेले व अजूनही सुरु असलेले अमोलिक संशोधन बरचं काही सांगून जातयं. त्याचा गोषवारा, ‘कृष्णार्पणमस्तु’च्या सुजाण […]

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’ Read More »

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’

सोव्हिएत युनियनवर आपण लादलेल्या, निर्दय हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली संपूर्ण देश भरडला जात असताना जोसेफ स्टॅलिन, एकदा पाॅलिटब्यूरोच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आला; तेव्हा, त्याच्या हातात एक घट्ट धरलेली ‘जिवंत कोंबडी’ होती…. बैठकीत सर्वांसमक्ष, एकेक करुन त्या कोंबडीची पिसे, तो अत्यंत निर्दयपणे उपटून फेकू देऊ लागला. बिच्चारी कोंबडी वेदनेनं तडफडत प्राणाच्या आकांतानं ओरडू लागली. त्त्वचेवरील रंध्रारध्रांतून, जागोजागी लाल रक्त

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’ Read More »

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!”

भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!! “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं,

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!” Read More »

मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची नियुक्ती का होत नाही?

१९ नोव्हेंबर रोजी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे… “५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड”, हा जो जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा संदेश सोशलमिडीयातून  प्रसारित करण्यात आला होता; त्यात, ‘अंध व आपमतलबी’ मोदीभक्तांना, खालील पहिलाच प्रश्न विचारण्यात आल्याचं वाचकांच्या स्मरणात असेलच…… १) “जर, नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची

मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची नियुक्ती का होत नाही? Read More »

५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!!

अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना अमेरिकेतल्या ड्रग-माफियांशी गुप्त समझोता केला आणि माफियांच्या गुन्हेगारीतल्या अफाट पैशाच्या बळावर ते अमेरिकचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले…. समझोत्याप्रमाणे पैशाच्या पुरवठ्याच्या बदल्यात, मावळते अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी जी ड्रग-माफियांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली होती; ती, निवडून येताच फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी तत्काळ मागे घ्यायची आणि ड्रग-माफियांना

५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!! Read More »

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!”

ही कहाणी आहे, ‘महाराष्ट्र’ नांवाच्या, आटपाट नगरीतील ‘मराठा समाजा’ची…. ज्या, समाजानं “प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता…” असा या, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीला ‘शककर्ता’ राजा दिला, त्या समाजावरच “पौर्णिमा ते अमावस्या” अशी पीछेहाटीची अवदसा ओढवलीच कशी ??? बायबलमध्ये लिहून ठेवलयं, “जेव्हा एखाद झाड… कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रतीचं आहे, हे तपासायचं असतं, तेव्हा इतर काही धडपड न करता, थेट

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!” Read More »

‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला!

“उधमपूर, गुरुदासपूर, पठाणकोट नंतर ‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला! भित्रट व आत्यंतिक स्वार्थी अशी दलाल-व्यापारीवृत्ती सत्तेत, म्हणून थेट संरक्षणतळांवरच सातत्याने हल्ला!!!” ५६” के ‘चुनावी’ सीनेवालों, अबतक ५६ फौजी तो कब के ‘शहीद’ हो चुके…. अब क्या ५६ सौ शहींदों की ‘शहादत’ का इंतजार है??? “वो एक को मारेंगे…. तो हम पाँच को मार

‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला! Read More »

‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..!

सार्वजनिक सण-उत्सव-पूजा-पार्टीसंस्कृति यांच्या प्रचंड भाऊगर्दीमुळे, आधीच ‘ग्लानी’त गेलेला सामान्य ‘मराठी माणूस’, वाढदिवसांच्या ‘वाढीव’ सुळसुळाटामुळे, आकण्ठ ग्लानीत बुडून गुलामगिरी भोगू लागलायं. मराठी घरातली ‘आवक’ फारशी वाढायला तयार नाही…. पण, ‘जावकी’त मात्र, वाढदिवसाच्या खर्चाची नवी भर पडत, जैन-गुज्जू-मारवाडी व्यापाऱ्यांचं (तुम्हाला ‘नादी’ लावून), अधिकचं चांगभलं होताना दिसतयं. अशा फाजील उत्सवप्रियतेमुळे सण-उत्सव काळात, लक्ष्मीच्या पाऊलखुणा उलट्या पडताना दिसू लागल्यात….

‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..! Read More »

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे…

भिवंडी कब्रस्थान पोलीसचौकी बांधकाम प्रकरणातील दंगेखोर सुटले… दळभद्री न्यायव्यवस्था व कालबाह्य भारतीय फौजदारी कायदे/गुन्हेगारी दंडसंहितेमुळे याच दंगलीत, ‘शहीद’ झालेल्या रमेश जगताप व बी. एस. गांगुर्डे या आमच्या दोन पोलीस-बांधवांचे खुनी मारेकरीही उद्या सुटतील! शासन बदलल्याला तब्बल दोन वर्ष होऊन गेली…. तथाकथित, मुस्लिमधार्जिणे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार जाऊन, ‘हिंदुत्वा’चे नारे लावणारे भाजपा-शिवसेनेचं सरकार आलं; पण, आजही ‘त्या’ भिवंडीच्या

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे… Read More »

कै. विलास शिंदेंच बलिदान, फुकट जाऊ देणं एक महापातक ठरू शकतं!

वाहतूक हवालदार ‘विलास शिंदें’चं दुःखद निधन, हे आज उभ्या महाराष्ट्रातल्या घराघरातलं ‘आक्रंदन’ बनलयं!…. जशी, १९६२च्या भारत-चीन युद्धात “भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी”, ही नागरिकांच्या आत्म्याची तडफड महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली होती…. तशीच तडफड, काल ‘तुकाराम ओंबळें’साठी आणि आज ‘विलास शिंदें’साठी, महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या ‘आत्म्या’ची होतेयं! ज्यांच्या हृदयाचा एक साधा ठोकाही, माझ्या

कै. विलास शिंदेंच बलिदान, फुकट जाऊ देणं एक महापातक ठरू शकतं! Read More »