Rajan Raje

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा…

“फडणवीसांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचा ‘उत्तर प्रदेश’ होण्याची प्रक्रिया गतिमान झालीय…फडणवीस हे महाराष्ट्राचे, कायदा धाब्यावर बसवणारे, नवे ‘योगी आदित्यनाथ’ झालेयत का?” …हे ‘एन्काऊंटर’, केवळ एका आरोपीचं नसून संपूर्ण ‘न्यायालयीन-व्यवस्थे’चं देखील आहेच, हे कसं विसरुन चालेल?? —————————————————————— सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपती-दर्शनासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या जाण्यातून…या देशाची न्यायव्यवस्था, भाजप-संघाची ‘बटीक’ झाल्याचा (याचा अर्थ, […]

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा… Read More »

‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!!

आजच्या चार महत्त्वपूर्ण बातम्या…आणि, त्यातील ‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!! *बातमी क्र. १…. “रामजन्मभूमी संकुलात साफसफाईचे काम करणार्‍या २० वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार!” (अर्थातच, ‘गोदी-मिडीया’तून ही बातमी गायब आहे किंवा अगदीच त्रोटक स्वरुपात कुठल्यातरी कोपर्‍यात पडून आहे) ‘रावणां’नी राजकीय लाभ मिळवण्याच्या व गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला ‘अतिस्वस्त मजूर’ (Cheap and Flexible Labour) उपलब्ध

‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!! Read More »

’सौरभ दास’ यांनी ट्विटरवर अखिल ‘भारतीय-वेदना’ प्रस्फुटित करताना, जे प्रभावी व प्रासंगिक भाष्य केलंय… त्यांच्या ‘X’ वरील त्या संदेशाच्या ओघवत्या मराठी-अनुवादावरील ‘धर्मराज्य-प्रतिक्रिया’…

(सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपती-दर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते…त्याचे फोटो मिडीयातून झळकले आणि देशाच्या सदसद्विवेक बुद्धीला एकच धक्का बसला…’सौरभ दास’ यांनी ट्विटरवर ही अखिल ‘भारतीय-वेदना’ प्रस्फुटित करताना, जे प्रभावी व प्रासंगिक भाष्य केलंय…त्या त्यांच्या ‘X’ वरील संदेशाचा ओघवता मराठी-अनुवाद…वाचकांच्या सोयीसाठी आम्ही खालीलप्रमाणे सादर करीत आहोत…तत्पूर्वी, संपूर्ण वेगळ्या धाटणीची ‘धर्मराज्य-प्रतिक्रिया’

’सौरभ दास’ यांनी ट्विटरवर अखिल ‘भारतीय-वेदना’ प्रस्फुटित करताना, जे प्रभावी व प्रासंगिक भाष्य केलंय… त्यांच्या ‘X’ वरील त्या संदेशाच्या ओघवत्या मराठी-अनुवादावरील ‘धर्मराज्य-प्रतिक्रिया’… Read More »

‘‘लालबागचा राजा आणि अनंत अंबानींनी दान केलेला सोन्याचा मुकूट’’….

भारतातील ८० कोटीहून अधिक जनता दारिद्र्यात खितपत पडलेली असताना, जे अंबानी कुटुंबिय ८-१० हजार कोटीच्या बंगल्यात रहातात, त्या मुकेश अंबानींचा कनिष्ठ चिरंजीव व ज्याच्या लग्नात, भुकेकंगाल भारतीय जनतेच्या अश्रू  सुकलेल्या शुष्क डोळ्यांदेखत त्यांच्या ‘अठराविश्वे दारिद्र्या’ला अगदी खिजवल्यासारखा, वाकुल्या दाखवल्यासारखा शेकडो कोटींचा चुराडा, अगदी हसत हसत नुकताच केला गेला (म्हणूनच, त्या लग्नसमारंभात आग्रहपूर्वक आमंत्रण असूनही ‘न’

‘‘लालबागचा राजा आणि अनंत अंबानींनी दान केलेला सोन्याचा मुकूट’’…. Read More »

“चौकीदार चोर है….”, ही राहुल गांधी यांची गाजलेली घोषणा कुणालाही आठवावी…असा एक गगनभेदी-मर्मभेदी प्रहार करणारा बँकिंगक्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री विश्वास उटगी यांचा हा व्हिडीओ आहे!

एकटा राहुल लढतोय, प्रियंका गांधी लढतेय…राष्ट्रीय स्तरावर पवन खेरा, सुप्रिया स्रिनेट, जयराम रमेश, कुमार केतकर यांच्यासारखे काही काँग्रेस नेते जीवाच्या कराराने लढतायत…पण, ठाणे-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पहावं, तर सगळ्याच काँग्रेस नेत्यांच्याबाबत अगदी ‘आनंदीआनंद’ आहे. फारसे हातपाय न हलवताच राहुल गांधींच्या पुण्याईवर निवडणुका जिंकायच्या आणि ‘महाविकास आघाडी’ची सत्ता भोगायची, अशी स्वप्न पहाण्यात ते मश्गुल आहेत! महाराष्ट्रापुरतं बोलायचं

“चौकीदार चोर है….”, ही राहुल गांधी यांची गाजलेली घोषणा कुणालाही आठवावी…असा एक गगनभेदी-मर्मभेदी प्रहार करणारा बँकिंगक्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री विश्वास उटगी यांचा हा व्हिडीओ आहे! Read More »

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!”

एकापाठोपाठ एक परिस्थितीवशात ‘माफीचा रतीब’ घालणाऱ्यांनो, आम्ही मतदार म्हणून अनेकदा मूर्ख बनत असतो…कधि ‘सब का साथ, सब का विकासा’च्या नादानं; तर, कधि ‘बालासोर सर्जिकल-स्ट्राईक’च्या रुपानं…आम्ही सहजी मूर्ख बनवले जात असतो…आणि, प्रत्येक निवडणुकीदरम्यान ‘उल्लू’ तर पिढ्यानपिढ्या बनलेलो असतोच (सध्या, आम्ही सत्ताधाऱ्यांचे अचानक ‘लाडके भाऊबहिण’ झालोत)…पण, आम्हाला एवढेही ‘बिनडोक’ समजू नका की, आमच्या ‘महाराष्ट्र-पुरुषा’चा पुतळा, तुमच्या किळसवाण्या

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!” Read More »

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान”

पाश्चात्य देशात, जनता स्वतः वर्गणी जमा करुन आपापल्या राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे उभारते…अगदी, अमेरिकन ‘स्वातंत्र्य देवतेचा पुतळा’ (Statue Of Liberty) देखील, विविध सार्वजनिक-उपक्रम राबवून, जनतेनेच पैसा गोळा करुन उभारला होता. पण, आपल्याकडे जनतेला भांडवली-व्यवस्थेनं एवढं ‘कफल्लक’ आणि राजकारण्यांनी एवढं ‘फुकटं’ बनवून ठेवलंय की, जनता पुतळे उभारण्यासाठी सोडाच; पण, निवडणुका लढवण्यासाठी देखील कपर्दिकही (जुन्या काळचं नाणं) देत

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान” Read More »

काश्मीरची नव्हे आणि बदलापूरची तर नव्हेच नव्हे….तर, अगदी ताजी घटना आहे ही झारखंडची!

झारखंडची राजधानी रांचीच्या मोराबादी मैदानावर भाजपा युवा मोर्चातर्फे ‘आक्रोश-रॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान, झालेल्या हिंसाचारात भाजपा-युवा मोर्चावाल्यांनी अट्टल दंगेखोरांसारखी खुलेआम पोलिसांवर तूफान दगडफेक करत त्यापैकी अनेक पोलीसांना गंभीर जखमी केलंय… बदलापुराच्या घटनेतील छुटपुट दगडफेकीचं निमित्त साधून समस्त बदलापूरकर-आंदोलकांना, मोठी पोलिसी-कार्यक्षमता दाखवत (जी एरव्ही, अंबरनाथ-बदलापुरच्या गुंड राजकारण्यांकडून दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत असताना पेंड खात असते),

काश्मीरची नव्हे आणि बदलापूरची तर नव्हेच नव्हे….तर, अगदी ताजी घटना आहे ही झारखंडची! Read More »

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..”

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” …यातून काही गंभीर प्रश्न अनुत्तरित रहातायत, ज्याचं ‘सूतोवाच’, मा. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या आजच्या ताज्या पत्रकार-परिषदेत केलंय…. तोच धागा पकडून आम्ही खालील सवाल जनतेसमोर ठेवत आहोत; ———————————————————————- ** न्यायालयाने फक्त उद्याचा ‘बंद’ बेकायदेशीर असल्याचा आज

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” Read More »

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…???

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? त्यांच्या आडनावातली ‘भगवतता’…व्यवहारात कधि उतरणार, व्यवहारात कधि दिसणार?? …शेजारच्या बांगलादेशातल्या हिंदुंविषयी एवढी कणव जर सरसंघचालक खरंच बाळगून असतील…तर, अशा ‘संवेदनशील’ सरसंघचालकांसमोर, एखाद्या आटपाटनगरीची कहाणी असावी तशी, आपल्याच देशातल्या ‘औद्योगिक व सेवा क्षेत्रा’तल्या नगरीतली… करोडो आत्म्यांची करुण कहाणी, आज मांडायचं ठरवलंय (अर्थातच, त्यांना हे

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? Read More »