प्रतिक्रिया

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया…

सर्वत्र व्हायरल झालेल्या वरील संदेशावर, ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे…आपल्या चरणी सादर! —————— …मुळातूनच ‘भांडवली-व्यवस्था’, हे मनुष्यजातीला जडलेलं, स्वतःच एक भयंकर ‘व्यसन’ असल्याने…तदनुसारच, आजची ‘कौटुंबिक-व्यवस्था’ देखील आत्मकेंद्रित व चंगळवादी बनत चाललीय, यात नवल ते काय? एकूणच भांडवली-व्यवस्थेतील अमानुष स्पर्धेला आपल्या अंगी भिनवूनच, त्याला समांतर अशी आपली आजची कौटुंबिक-व्यवस्था पुढे धावू पहाते. शिक्षण घेत असतानाचे भयानक ताणतणाव […]

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया… Read More »

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया…

उत्तर-दिशादिग्दर्शन करत, रात्रीच्या अंधःकारमय विश्वात अचूक मार्गदर्शन करणाऱ्या, आकाशातल्या अढळ ध्रुव तार्‍यासारखेच भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरलेल्यांपैकी एक ‘ध्रुव राठी’… एखाद्या ‘अग्निपथावरावरुन चालणाऱ्या अग्निवीरा’सारखा (मोदी-शाह सरकारकडून गंडवले गेलेले ‘अग्निपथावरील लष्करी अग्निवीर’ नव्हे!) या व्हिडीओतून… महाभारत युद्धसमयी श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं विश्वरुप दर्शन घडवलं होतं…तसंच, मोदी-शाह सरकारच्या ‘काॅर्पोरेट-शाही’च्या काळ्याकुट्ट अंतरंगाचं रौद्रभीषण दर्शन आपल्याला घडवतोय! अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया… Read More »

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग…

प्रत्येक भारतीय तरुणाने (विशेषतः, मराठी-तरुणाईने), हे ध्यानात घ्यावं की, या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), हेच खरंखुरं अंतरंग आहे…!!! (‘THE HINDU’च्या सौजन्याने…) ‘डेमोग्राफिक-डिव्हिडंड’ वगैरे मोठे मोठे शब्द… ‘मन की बात’पासून निवडणुकीच्या भाषणातील ‘जन से बात’पर्यंत व्यक्त होणारी भारतीय ‘तरुणाईची कवतिके’ (कौतुकं), ही भांडवली-व्यवस्थेची सगळी निर्लज्ज-निरर्गल सोंगंढोंगं असतात! …जोपर्यंत, “भांडवली-दहशतीला सपशेल शरण जाऊन, कंपन्या-कारखान्यांमधून कंत्राटी-कामगार किंवा वेठबिगार

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग… Read More »

‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”???

केवळ साडेतीन लाख मूळ नागरिक व २३ लाखाच्या आसपास देशाबाहेरचे स्थलांतरित मजूर (त्यातले १० लाख भारतीय, अर्थातच प्रामुख्याने केरळी)…अशा, अंगाने अगदीच किरकोळ असलेल्या, एका कतार नावाच्या देशाने, भारतासारख्या खंडप्राय देशाला एकदा नव्हे; दोनदा फटकारत, आपल्या देशाची आणि देशाच्या तथाकथित ‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”??? …पहिल्यांदा भाजपाच्या नुपूर शर्मा-नवीन जिंदालकृत प्रेषित

‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”??? Read More »

महाराष्ट्रातले बहुजन तरुण: राजकारणाचा नवा अध्याय

दंगली करण्यात, सध्या ‘मुस्लिम/ओबीसी’ अनेकठिकाणी आघाडीवर दिसतात… कारण, अनुसूचित जाती-जमातीचे (SC/ST) तरुण आता थोडेबहुत शहाणे व्हायला लागलेत म्हणून, हल्ली, स्वतःच्या घरातली व जवळची पोरंबाळं सुरक्षित घरी आहेत, हे नीट तपासून, “पेटवा रे पेटवा” असं नेतेमंडळींनी म्हटलं तरी, सहजी दंगली पेटत नाहीत आणि चुकूनमाकून पेटल्या तरी चारपाच दशकांपूर्वी वेड्यावाकड्या पेटायच्या तशा पेटत नाहीत, पेटणार नाहीत…. सत्यपरिस्थिती

महाराष्ट्रातले बहुजन तरुण: राजकारणाचा नवा अध्याय Read More »

चंगळवाद

चंगळवाद, महत्त्वाकांक्षाग्रस्तता आणि मानसिक अस्थैर्य यात जवळचा संबंध असून त्यातून आत्यंतिक स्वार्थी, प्रचंड स्वकेंद्रित, चंगळवादी, स्पर्धात्मक वृत्ती तयार होऊन संबंधित लोकं नैराश्य, चिंताग्रस्तता, एकाकीपणा इत्यादी मानसिक व्याधींनी ग्रस्त होत, व्यसनाधीन बनतात…. केवळ, इथपर्यंतच अच्युत गोडबोले म्हणतात त्याप्रमाणे, मानवीअधोगतीचा प्रवास होत नाही; तो ‘चंगळवादा’तून सुरु झालेला हा प्रवास अखेर ‘मानवी-असतित्वा’लाच ग्रहण लावण्यापर्यंत थेट पोहोचतो कसा, हे

चंगळवाद Read More »

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान देताना, ‘‘भाजपा, स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो; पण, त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते… भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर, ‘आम आदमी पार्टी’ राजकारण सोडेल’’, असं अरविंद केजरीवाल यांनी दंड थोपटत म्हटलंय.. अरविंद

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य Read More »

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”…

(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..) केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते,

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… Read More »

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???……

दहा वर्षांची घुसमट, एकदाची निर्धाराने संपवत, तनुश्री दत्ताने नाना पाटेकराला जमिनीवर पाठ टेकवायला लावलीय…. या तिच्या हिंमतीबद्दल तिचं कौतुक करावं, तेवढं थोडचं! सर्वसाधारणपणे, भारतीय समाजातीलच काय; पण, अगदी प्रगत राष्ट्रांमधील (अगदी हाॅलिवूडच्या ‘मर्लिन मन्रोसारख्या ख्यातनाम नट्यासुद्धा) महिला वा महिला कलाकार, आपल्या लैंगिक शोषणाबद्दल वा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलायला सहजी तयार होत नाहीत (त्यातलं सध्या भयंकर गाजणारं

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???…… Read More »

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं……

संजय निरुपमा, मुंबई-महाराष्ट्र आमच्या जीवावर चालतो, या उद्दाम आणि फुकाच्या वल्गना तू आता एकदम बंद कर… तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… बघूया, त्यामुळे, मुुंबईसह  असलेला “शिवबा-संतां”चा महाराष्ट्र, तुझ्या भाकिताप्रमाणे कोसळतो की, तुम्ही युपी-बिहारवाले भीकेला लागता, ते एकदाचे समजेल !!! सालं, आमच्या जीवावर जगायचं आणि आम्हालाच

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… Read More »