धर्मराज्य पक्ष

‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी ‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ या पुण्यात्म्यांच्या प्राणांची आहुती…

‘संत निगमानंदजीं‘ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद‘ यांनी ‘गंगामैय्ये‘च्या रक्षणासाठी नुकतीच प्राणांची आहुती दिली… त्यानंतर, ‘संत गोपालदास‘, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत… त्यांची दिव्य-तेजस्वी प्राणज्योत मालवायला, आता काळाच्या फक्त एका हलक्या फुंकरीची गरज तेवढीच उरलीय… ती ही ‘गरज‘, येत्या काही दिवसात, या देशातल्या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”कडून (Vampire […]

‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी ‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ या पुण्यात्म्यांच्या प्राणांची आहुती… Read More »

आज ‘नथुराम’ असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती…..

“नमामि गंगे” आणि “माँ गंगामैय्याने मुझे यहाँ बुलाया है….” असं म्हणतं, उ. प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी, केवढे महान “गंगाभक्त” नव्हे काय? अहो, महाभारतातल्या गंगापुत्र पितामह भीष्म वा कुंतीपुत्र  दानशूर कर्णाची ‘गंगाभक्ती’ही थिटी पडावी… एवढी नरेंद्र मोदींची ‘गंगाभक्ती’ खरोखरीच अगम्य-अवर्णनीय नव्हे काय?? दिवाळीच्या मुहूर्तावर गंगेला लाखो तेलाचे दीप अर्पण करणारे मोदी पहा आणि गंगेच्याच

आज ‘नथुराम’ असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती….. Read More »

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???……

दहा वर्षांची घुसमट, एकदाची निर्धाराने संपवत, तनुश्री दत्ताने नाना पाटेकराला जमिनीवर पाठ टेकवायला लावलीय…. या तिच्या हिंमतीबद्दल तिचं कौतुक करावं, तेवढं थोडचं! सर्वसाधारणपणे, भारतीय समाजातीलच काय; पण, अगदी प्रगत राष्ट्रांमधील (अगदी हाॅलिवूडच्या ‘मर्लिन मन्रोसारख्या ख्यातनाम नट्यासुद्धा) महिला वा महिला कलाकार, आपल्या लैंगिक शोषणाबद्दल वा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलायला सहजी तयार होत नाहीत (त्यातलं सध्या भयंकर गाजणारं

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???…… Read More »

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं……

संजय निरुपमा, मुंबई-महाराष्ट्र आमच्या जीवावर चालतो, या उद्दाम आणि फुकाच्या वल्गना तू आता एकदम बंद कर… तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… बघूया, त्यामुळे, मुुंबईसह  असलेला “शिवबा-संतां”चा महाराष्ट्र, तुझ्या भाकिताप्रमाणे कोसळतो की, तुम्ही युपी-बिहारवाले भीकेला लागता, ते एकदाचे समजेल !!! सालं, आमच्या जीवावर जगायचं आणि आम्हालाच

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… Read More »

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!!

‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष म्हणून नव्हे; तर, या देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मला अशा मोठ्या राजकीय व्यक्तिंच्या निधनापश्चात, काही साधेसुधे प्रश्न सतावत रहातात. प्रश्न असा…. ज्याची गेले काही दिवस, नंतर पुढे कित्येक महिने, वर्षे…. विविध दूरदर्शन वाहिन्यांवरुन साग्रसंगीत, रसभरीत (अगदी अंतःकरण गदगदून टाकणारी) चर्चा चालू राहील…. ती स्व. अटल बिहारी वाजपेयींची ‘संवेदनशीलता’, ही अशी विशिष्ट कोंदणातच

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!! Read More »

“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार

औरंगाबादला कारखान्यांवर संतप्त मराठा-कंत्राटी कामगारांचा मोर्चा वळताच…. शरद पवार कळवळले. मराठा-आंदोलनात दुर्दैवाने आजवर, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचं एवढं नुकसान होत होतं, तरी असा कळवळा शरद पवारांना फुटला नव्हता, तो एकदम कारखान्यांकडेच शोषित मराठा तरुणाईच्या संतापाचा रोख वळताच फुटला… हे, उद्योग जगतावरचं शरद पवारप्रणित ‘पाॅवरफूल प्रेम’ नव्हे काय? पवार-ठाकरे परिवारांच्या दळभद्री राजकारणामुळेच धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र

“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार Read More »

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”!

आॅगस्ट १, “पृथ्वी सीमोल्लंघन दिन” (August 1, Earth Overshoot Day…. the world is living on borrowed time) पृथ्वीवरील मानवजात, “आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! एखाद्या वर्षाच्या ज्यादिवशी, निसर्गाच्या वार्षिक पुनर्निर्माण क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात, मानवजात नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, लाकूड, अन्न, कार्बन इ.) अधिकचा वापर करु लागते…. तो दिवस, “पृथ्वी सीमोल्लंघन वा मर्यादोल्लंघन दिन” म्हणून ओळखला

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! Read More »

NOTA (None Of The Above)….

लोकशाहीच्या चार आधारस्तंभांच्या उभारणीत व अस्तित्वात पायाभूत स्वरुपात असणाऱ्या ‘निवडणूक-प्रक्रिये’त क्रांतिकारक सुधारणा करण्याच्या दृष्टीने, आजवर कुठलाही संसदेत-विधिमंडळात प्रभावी कायदा पारित झालेला नसतानाही…. आपल्या कार्यकक्षेत व अधिकारात, दीर्घकाळ प्रलंबित असणारे पाऊल, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग प्रमुख सर्वश्री. जे. एस. सहारिया उचलू पहातायत…. लक्षणांवर नव्हे; तर मूळ रोगाच्या आसाला भिडून उपचार करु पहाणाऱ्या या ‘धन्वंतरी’ला “धर्मराज्य पक्षा”चा

NOTA (None Of The Above)…. Read More »

लंगडे विकृत नेतृत्त्व आणि लंगडणारा समाज (गिरीदंतजातककथा)

{ही गिरीदंतजातककथा, मला ‘संजय पगारे’ (८९२८४५५१०५) या एका जाज्वल्य बुध्द धम्म प्रसारकाने व्हाॅट्स्अॅपवर पाठवली. पण, ही कथा एवढी मर्मग्राही आहे आणि तिचा संदेश एवढा व्यापक व मर्मभेदी आहे…. की, तो प्रखर संदेश, वर उल्लेखल्याप्रमाणे फक्त, अनुसूचित जातीजमातींपुरताच मर्यादित नसून, महाराष्ट्रातील तमाम ‘मराठी माणसां’ना तंतोतंत लागू आहे.} म. फुले, टिळक, सावरकर, आंबेडकर, सेनापती बापट, एस.एम. जोशी,

लंगडे विकृत नेतृत्त्व आणि लंगडणारा समाज (गिरीदंतजातककथा) Read More »

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”

अवघं चराचर ‘अस्तित्व’ हेच, ‘ईश्वरतत्त्व’ मानणारी… सगळं जगच आपल्या प्रेमळ कवेत सामावून घेणारी विश्वगामी, विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”! …. शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात एक असा महान संत होऊन गेला, ज्यानं मराठी-संस्कृतीचं हे लेणं, खालील शब्दात अतिशय प्रत्ययकारीरित्या अधोरेखित केलयं…. संत सावता माळीं चे हे उच्चारण, जणू संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’सारखाच एक ‘अमृतानुभव’ होय !!!! “कांदा, मुळा, भाजी

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती” Read More »