पर्यावरण

तरीही, गंगा ‘मैली’ आणि ‘अर्धमेली’ होतेच आहे…..

गंगा-यमुना संगमी हजारो कोटींच्या ‘कुंभमेळ्या’चं (खरंतरं, ‘दंभमेळ्या’चं) आयोजन करणारे, हे कसले ‘हिंदुत्ववादी’…हे फक्त, कसलेले ‘सत्तावादी व भांडवलवादी’! कुंभमेळ्याचं आयोजन…हे केवळ, कुंभस्थळी अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरीत मरणाऱ्या शेकडो भाविकांच्या सरणावरच नव्हे; तर, जाज्वल्य साधुसंतांच्या बलिदानाच्या पापांच्या राशीवर कसं घडतं गेलंय…ते तपासून पहाणं, भारतीय-अध्यात्माचा सच्चा पाईक असलेल्या, प्रत्येक खऱ्याखुऱ्या ‘धार्मिक’ (दांभिक नव्हे) हिंदुचं ‘धर्मकर्तव्य’च होय! गंगामातेच्या शुद्धीकरणासाठी व तिचं […]

तरीही, गंगा ‘मैली’ आणि ‘अर्धमेली’ होतेच आहे….. Read More »

“आजचा शिक्षित-अशिक्षित समाज, जी काही उरलीसुरली संस्कृती शिल्लक आहे, ती सोडून झपाट्याने अधिकाधिक विकृतीकडे वळतोय”!

‘नमामि गंगे’ या २०१४पासूनच्या गंगानदीच्या शुद्धीकरण-प्रकल्पाच्या २२ हजार कोटी रुपयांचं गौडबंगाल काय? गंगा-यमुना जर आजही एवढी ‘मैली’ असेल; तर, कुठे गेले ते खर्च केलेले पैसे?? …असे प्रश्न विचारण्याची हिंमत व सकस मानसिकता दाखवण्याऐवजी अंधश्रद्धेचा केवळ ‘बाजार’ नव्हे; तर, फार मोठा ‘आजार’ पसरवणार्‍या…आणि त्याहीपेक्षा कैकपटीने घातक असा धोका म्हणजे, त्याची परिणती म्हणून हिंसक, विकृत, भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना-राजकारण्यांना

“आजचा शिक्षित-अशिक्षित समाज, जी काही उरलीसुरली संस्कृती शिल्लक आहे, ती सोडून झपाट्याने अधिकाधिक विकृतीकडे वळतोय”! Read More »

भारतातील हवामान संकट: उत्तराखंड ते केरळ, पर्यावरण संवर्धनाची निकड

दोनर्षांपूर्वी उत्तराखंड, आता केरळ (वायनाड…जिथे, हवामानखात्याकडून फक्त तयारीला लागण्याच्या, २४ तासात जास्तीतजास्त २०४.४ मि.मी. पावसाच्या नारिंगीरंगाची सावधगिरीची सूचना अथवा ‘ऑरेंज ॲलर्ट’ दिला गेला होता; पण, प्रत्यक्षात दुपटीहून अधिक म्हणजे ४०९ मि.मी. पाऊस पडला आणि दिडशे लोक मृत्यूमुखी; तर, दोनशेहून अधिक गंभीर जखमी झाले) आणि पुढे ‘कोकण की, मुंबई’…??? पश्चिम घाट परिसरातील जैवबहुविधतेचं संरक्षण व जतन

भारतातील हवामान संकट: उत्तराखंड ते केरळ, पर्यावरण संवर्धनाची निकड Read More »

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण

😩या पृथ्वीवर ‘भांडवली-व्यवस्थे’तील माणसाइतका क्रूर जीव, दुसरा कुठलाही असूच शकत नाही…क्रूरता-निर्दयता, तुझं नाव, दोन पायाचा ‘मनुष्यप्राणी’! ‘गोमाता’ तोंडाने जपत रहायचं आणि तिचे खाटीकखाने चालवणाऱ्यांकडून निवडणुकीसाठी ‘चंदा’ गोळा करायचा धंदा थाटायचा…’गोमाता’ म्हणत राजकारण करत रहायचं आणि तिला, तिच्या वासरापासून व वासराला, अधिकचा पैसा कमावण्यासाठी, तिच्या स्तन्यापासून क्रूरपणे तोडायचं (Invention of New Spike-Device)…घोर कलियुग, अजून दुसरं काय

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं.. “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२ ———————————————————————– काश्मीरच्या रद्द केलेल्या ३७० कलमाभोवती, बीजेपीची ‘चुनावी-दुनिया’ फिरत असताना… ‘बीजेपी’ने, काश्मीर खोर्‍यातील लोकसभा-निवडणुकीच्या मैदानातून पार्श्वभागाला पाय लावून पळ का काढलाय? आणि, ‘लडाख’ला राज्यघटनेच्या ६ व्या परिशिष्टात टाकण्याच्या आपल्याच आश्वासनाला हरताळ का फासलाय?? हीच का, ती ‘मोदींची

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२ Read More »

“फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास!

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ८ —————————————————– “फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास! २०१४मध्ये नरेंद्र मोदी, मनमोहनसिंगांच्या काँग्रेस-सरकारवर टीका करताना म्हणत होते, “लोक विचार करत असतात की, सचिन तेंडुलकरची ‘सेंच्युरी’ प्रथम पुरी होणार की, कांद्याच्या भावाची ‘सेंच्युरी’ पुरी होणार?” तेव्हा, गटारातून

“फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास! Read More »

‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ५ ‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही…. अयोध्येत राममंदिर बांधलं यांनी; पण बेरोजगारी, महागाई, नोकरीच्या ठिकाणी ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate-Terrorism), हुकूमशाहीतली ‘सरकारी-दहशत’, अमानुष आर्थिक-विषमता, नोटबंदी-इलेक्टोरल बाॅण्ड्स्, ‘PMCare’ फंडासारखे या शतकातले सगळ्यात मोठे घोटाळे याद्वारे, तुमच्याआमच्या जगण्यातला त्यांनी

‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही…. Read More »

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल (युनोचे हवामानबदल-समितीचे प्रमुख) निवडणुकीच्या रणधुमाळीत, आपल्यासह अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या आसाला भिडलेला हा क्षीण स्वर, ऐकू येतोय का आपल्याला, जरा पहा…!!! जागतिक अर्थमंचाच्या (WEF) व्यासपीठावर वर्चस्व गाजवणारी G-20 राष्ट्रे (ज्याची, १८ वी परिषद गेल्यावर्षी ९-१० सप्टेंबर रोजी दिल्लीत मोठ्या दिमाखात भरवली गेली होती)…ही, जगातील

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल Read More »

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’

मित्रहो, खालील सगळ्याचा अर्थ फार फार गंभीर आणि जनसामान्यांचं जीवन उध्वस्त करुन त्यांना अखंड गुलामगिरीत ढकलण्याचा फक्त, आहे… गेल्या दोनतीन दशकांपूर्वीपासूनच आम्ही “कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती”ची अवदसा आली, …आता ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ येणार, हे गंभीर इशारे सातत्याने देत होतो; पण, ऐकतो कोण??? “शहर-उपनगरातले नोकरदार आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसह अलुतेदार-बलुतेदार, बाजारपेठेतील आपली सगळी ‘आर्थिकपत’ या ‘कंत्राटीकरणा’च्या फेऱ्यात गमावून बसले

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ Read More »

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील…

कधि, काश्मीरचं कलम ३७०, कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…. या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, गुलामगिरी व जगण्याच्या कोंडीत वाया जात राहील !!! या जगात अशी कुठलीही व्यक्ति असू शकत नाही, असत नाही… कुठलाही धर्मग्रंथ वा अन्य, कुठलीही बाबही अशी असूच शकत नाही; की, जी कळीकाळालाही पुरुन उरु शकेल. विश्वाची पोकळी,

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील… Read More »