मजूर-कंत्राटदारी

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)….

ज्या फ्रेंच-राज्यक्रांतीनंतरच, संसदेत बसण्याच्या व्यवस्थेतून ‘डावे’ (साम्यवादी-समाजवादी गट) आणि ‘उजवे’ (भांडवलवादी गट) अशा दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांचं विभाजन जगभरात रूढ झालं…त्याच फ्रान्समधे, नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रेंच नॅशनल ॲसेंब्ली’च्या सार्वत्रिक-निवडणुकीत डाव्यांना मोठा ऐतिहासिक विजय मिळालाय… आणि, तो विजय म्हणजे जणू, युरोप-अमेरिकेसारख्या भांडवलप्रधान राष्ट्रांमधल्या बदलत्या सामाजिक व राजकीय वातावरणाची नांदीच होय! यंदाच्या फ्रान्समधील निवडणुकीत ‘न्यू पाॅप्युलर फ्रंट’ […]

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)…. Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक १८

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक१८ ————————————————————- (या १८व्या लोकसभेची निवडणूक, १८ आकड्यासारखीच ‘लोकविलक्षण’ आहे…भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध आणि वेदकालीन १८ गणराज्यं इ. …आपलंही गणराज्य (लोकशाही) सुरक्षित रहावं, यासाठी ही ‘स्वातंत्र्याची तिसरी

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक १८ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७ ———————————————————— भारतीय-अध्यात्मानुसार “राजाकडे द्रव्य नसलं, अन्नधान्य नसलं, अगदी सैन्य नसलं तरी चालेल; पण, त्याच्याकडे ‘विश्वास’, हा असलाच पाहिजे”…त्यातून सगळंच पुन्हा उभारता येईल; पण, जर विश्वासच नसेल तर उपयोग काय? …दिल्लीश्वर, हे उद्योगपती ‘अदानी’चे मित्र असलेले ‘अडाणी’ सत्ताधीश

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९: ४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’!

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया” , मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९ —————————————————————————————— रोज उठून भाषणात मु’सल’मान द्वेषाचा ‘सल’…देश बुडला तरी चालेल; पण, बुडत्या देशाची सत्ता, आपल्याच हाती राखण्याकडचा नृशंस ‘कल’…४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’! मुळातून, इंडिया-आघाडीच्या विजयानंतर भाजपाच्या ‘कमळ’ निशाणीवर पुनश्च नव्याने

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९: ४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’! Read More »

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत…..

एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्‍या…आणि, दुसर्‍या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’…. ———————————————– ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत….. Read More »

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग…

प्रत्येक भारतीय तरुणाने (विशेषतः, मराठी-तरुणाईने), हे ध्यानात घ्यावं की, या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), हेच खरंखुरं अंतरंग आहे…!!! (‘THE HINDU’च्या सौजन्याने…) ‘डेमोग्राफिक-डिव्हिडंड’ वगैरे मोठे मोठे शब्द… ‘मन की बात’पासून निवडणुकीच्या भाषणातील ‘जन से बात’पर्यंत व्यक्त होणारी भारतीय ‘तरुणाईची कवतिके’ (कौतुकं), ही भांडवली-व्यवस्थेची सगळी निर्लज्ज-निरर्गल सोंगंढोंगं असतात! …जोपर्यंत, “भांडवली-दहशतीला सपशेल शरण जाऊन, कंपन्या-कारखान्यांमधून कंत्राटी-कामगार किंवा वेठबिगार

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग… Read More »

‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”???

केवळ साडेतीन लाख मूळ नागरिक व २३ लाखाच्या आसपास देशाबाहेरचे स्थलांतरित मजूर (त्यातले १० लाख भारतीय, अर्थातच प्रामुख्याने केरळी)…अशा, अंगाने अगदीच किरकोळ असलेल्या, एका कतार नावाच्या देशाने, भारतासारख्या खंडप्राय देशाला एकदा नव्हे; दोनदा फटकारत, आपल्या देशाची आणि देशाच्या तथाकथित ‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”??? …पहिल्यांदा भाजपाच्या नुपूर शर्मा-नवीन जिंदालकृत प्रेषित

‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”??? Read More »

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत!

दुबेंच्या ‘सुपारीबाज’ निशिकांतचा जो ‘आकांत’, आजवर चालत आलेला आहे… तो कधि राहुल गांधींच्या विरोधात, कधि ‘आप’च्या जिगरी संजयसिंगांच्या (सध्या टार्गेट, महुआ मोईत्रा) विरोधात, तर कधि मोदी-शाह राजवटीतल्या तमाम गैरप्रकारांवर लिहीणार्‍या पत्रकारांवर विरुद्ध… असा, कायमच ‘सुपारी’ घेतल्यासारखा चालू असतो. तेच, त्या निशिकांत दुबेंचं एकमेव कर्तृत्त्व (ज्यातून, लोकसभा-निवडणुकीतील तिकीट पक्कं करण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे). एकूणच विरोधकांच्या

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय???

केवळ, प्राचीन-अर्वाचीन इतिहासच नव्हे; तर स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, आजमितीस घडणारा कुठलाही घटनाक्रम… हा आपल्याला ‘गुरु’ बनून वेगवेगळ्या शिकवणुकीचा ‘धडा’ सातत्याने देत असतो; फक्त, त्यासाठी तसा शोधक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन मात्र, आपल्यापाशी हवा!  ‘‘महाभारतात कपटी इंद्राला कवचकुंडलं दान केल्यानं दानशूरतेचा अतिरेक (सद्गुणाचा अतिरेक, हा ही एक दुर्गुणच) करणाऱ्या कर्णाचा युद्धात वध करणं, अर्जुनाला शक्य

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय??? Read More »