Rajan Raje

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह […]

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री)

सन्माननीय उपमुख्यमंत्री सर्वश्री अजितदादा पवार, “शासकिय-सेवेत एका ‘कायम’ कर्मचाऱ्याच्या जागी तीन ‘कंत्राटी-कर्मचारी’ घेता येतील”, या आपल्या ‘कामगारहितदक्ष कल्याणकारी-उच्चारणा’ला एकप्रकारचं ‘कामगारविरोधी वाक्ताडन’च समजून… आम्ही पामरांनी फार चुकीचा अर्थ लावला हो आणि आपल्यावर नाहक टीकेचा केवढा काहूर माजवला आम्ही… प्रथम, त्याबद्दल क्षमस्व! आपला मूळ उद्देश किती गहन होता, हे अंमळ उशिरानेच आमच्या ध्यानी आलं (“आपण बोलून मोकळं

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री) Read More »

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’

भांडवली-व्यवस्थेच्या दमनकारी दबावाविरुद्ध; तसेच, कंपनी-दहशतवादाविरोधात (Corporate-Terrorism) छाती पुढे काढून तडफेनं व एकजुटीने संघर्षरत रहात… तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखं तावूनसुलाखून निघण्याऐवजी, मराठी कामगार… आपापसात फाटाफूट करत व ‘‘कामगारच कामगाराचा शत्रू बनत’’… गद्दारी व पळपुटेपणा करताना दिसतोय… दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ सेवन करत, ‘‘नरेचि केला हीन किती नर’’, याचा अवघ्या कामगार-विश्वाला कंपन्या-कंपन्यांमधून परिचय देतोय,

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ Read More »

कॉर्पोरेट-दहशतवाद

गेली अनेक वर्षांपासून कंपनी-दहशतवादाबद्दल (Corporate-Terrorism) कंठशोष करुन आम्ही बोलतो आहोत, जीव तोडून लिहीतो आहोत… पण, लक्षात कोण घेतो ??? ‘दहशतवाद’, हा कोणाचाही, कुठल्याही कारणाने असो… त्याची नांगी वेळीच साफ ठेचून टाकलीच पाहीजे! विशेषतः, “जातधर्मीय आणि काॅर्पोरेटीय दहशतवाद” तर, जिथे असेल तिथे, जिथे दिसेल तिथे… कठोरपणे समूळ निपटून काढलाच पाहीजे. …मात्र, जिथे ‘सततच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध दाद मागणं

कॉर्पोरेट-दहशतवाद Read More »

देशात हुकूमशाही आहे की, लोकशाही?

देश राज्यघटनेनुसार ‘संघराज्यीय’ पद्धतीने चालतोय की, राज्यघटनेतल्या त्रुटींचा गैरफायदा घेऊन मनमानी पद्धतीने?? (‘पेगॅसस सॉफ्टवेअर’सारखी अनेक लोकशाहीविरोधी व घटनात्मक तरतुदींना हरताळ फासणारी एकापेक्षा एक प्रकरणे उजेडात येत असतानाच… ”लोकशाहीमूल्यांना व संकेतांना” पायदळी तुडवणारा सगळा घटनाक्रम काही थांबायलाच तयार नाही…) १) भारत आज, “बुलडोझर-रिपब्लिक” , उद्या काय यादवीयुद्धग्रस्त “बनाना-रिपब्लिक”??? काॅ. वृंदा करात, ही ७५ वर्षीय लढवय्यी ‘मार्क्सवादी

देशात हुकूमशाही आहे की, लोकशाही? Read More »

महाराष्ट्रातले बहुजन तरुण: राजकारणाचा नवा अध्याय

दंगली करण्यात, सध्या ‘मुस्लिम/ओबीसी’ अनेकठिकाणी आघाडीवर दिसतात… कारण, अनुसूचित जाती-जमातीचे (SC/ST) तरुण आता थोडेबहुत शहाणे व्हायला लागलेत म्हणून, हल्ली, स्वतःच्या घरातली व जवळची पोरंबाळं सुरक्षित घरी आहेत, हे नीट तपासून, “पेटवा रे पेटवा” असं नेतेमंडळींनी म्हटलं तरी, सहजी दंगली पेटत नाहीत आणि चुकूनमाकून पेटल्या तरी चारपाच दशकांपूर्वी वेड्यावाकड्या पेटायच्या तशा पेटत नाहीत, पेटणार नाहीत…. सत्यपरिस्थिती

महाराष्ट्रातले बहुजन तरुण: राजकारणाचा नवा अध्याय Read More »

‘हिंदू-मुस्लिम एकता सद्भावना यात्रा’ रॅली

आपल्या धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कामगार-कर्मचारीवर्गाने आणि ‘सेऊ’च्या सभासदांनी, या भयंकर उष्म्यात (‘जागतिक तापमानवाढी’मुळे तापमान जवळपास ४३-४४° सेंटीग्रेड पर्यंत पोहोचलेलं असताना) एवढी मोठी रॅली काढण्यासाठी, जी मेहनत घेतली व त्यात धाडसाने प्रत्यक्ष सहभाग घेतला… त्याला, तोड नाही! अन्य कुठलाही प्रस्थापित राजकीय नेता वा पक्ष, वाटेल तेवढा पैसा फेकूनही अशी रॅली, या

‘हिंदू-मुस्लिम एकता सद्भावना यात्रा’ रॅली Read More »

एसटी संपाचं कवित्व….

(उषःकाल होता होता काळरात झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!) महाराष्ट्रभरात विखुरलेला ८५ हजारांच्या वर कामगार-कर्मचारीवर्ग, एवढ्या पाच-साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ संपात स्वतःला झोकून देतो…. त्याचा अर्थ एकच, त्यांच्या पायाखाली दीर्घकाळ बरंच काही जळत होतं, पोटात आणि मस्तकात दीर्घकाळ एक आगीचा लोळ उठत होता. ग्रामीण मराठी जनतेनंही कमालीचा त्रास व अडचण सोसून, या आपल्या लढवय्या ‘मराठी

एसटी संपाचं कवित्व…. Read More »

वादे वादे जायते तत्त्वबोध: जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण तेच खरं पिढ्यापिढ्यांचं वात्सल्य प्रेम आणि संवेदनशील राम-संबोधन

जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण, तेच खरं पिढ्यापिढ्यांचं खास ‘रामा’साठीचं  वात्सल्य, प्रेम आणि संवेदनशील असं, उत्तर भारतीय संबोधन होतं आणि तेच मराठीत ‘जय सीताराम’ होतं! ‘जय सियाराम, जय सीताराम’ला मागे सारुन ‘जय श्रीराम’सारखं काहीसं उग्र स्वरुपाचं राम-संबोधन, कधितरी लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेच्या काळाच्या आसपास उत्तर भारतात प्रसवलं, पसरवलं गेलं असावं… ते ही अगदी

वादे वादे जायते तत्त्वबोध: जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण तेच खरं पिढ्यापिढ्यांचं वात्सल्य प्रेम आणि संवेदनशील राम-संबोधन Read More »

चंगळवाद

चंगळवाद, महत्त्वाकांक्षाग्रस्तता आणि मानसिक अस्थैर्य यात जवळचा संबंध असून त्यातून आत्यंतिक स्वार्थी, प्रचंड स्वकेंद्रित, चंगळवादी, स्पर्धात्मक वृत्ती तयार होऊन संबंधित लोकं नैराश्य, चिंताग्रस्तता, एकाकीपणा इत्यादी मानसिक व्याधींनी ग्रस्त होत, व्यसनाधीन बनतात…. केवळ, इथपर्यंतच अच्युत गोडबोले म्हणतात त्याप्रमाणे, मानवीअधोगतीचा प्रवास होत नाही; तो ‘चंगळवादा’तून सुरु झालेला हा प्रवास अखेर ‘मानवी-असतित्वा’लाच ग्रहण लावण्यापर्यंत थेट पोहोचतो कसा, हे

चंगळवाद Read More »