राजकारण (Politics)

राजकारण (Politics) ही कॅटेगरी सरकार, सत्ता, धोरणं, निवडणुका आणि समाजातील सत्तासंबंधांवर आधारित विषयांचा वेध घेते. ह्या विभागातून वाचकांना सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्षांची भूमिका, नेत्यांचे वक्तव्य, जनतेवर होणारे परिणाम आणि भविष्यकालीन राजकीय दिशादर्शन याबाबत सखोल माहिती मिळते.

II भक्त तथा, कंबख्त II

‘‘मोदी सरकार की उधड रही है ‘खाल’…. ‘मोदी-भक्तों’ का, क्या है ‘खयाल’ ??? गौ दूध नाले में, गौ मूत्र प्याले में, बलात्कारी विधिमंडल में और पिडीता पुलिस थाने में….अनपढ़, गँवार संसद की सेंट्रल हाॅल में और पढे-लिखे शिक्षित राममंदिर की कतार में…. ‘‘बेरोजगार और ठेकेदारी-नीम (NEEM) के ‘गुलाम’ मजदूर-कर्मी, कर रहे हो चर्चा कलम ३७०, […]

II भक्त तथा, कंबख्त II Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!”

भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!! “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं,

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!” Read More »

ब्रेक्झिटचं कवित्व……

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक व अमेरिकन ‘गन-लाॅ‘ बदलण्याची धामधूम, फ्रान्समध्ये ‘कामगार-कायदे‘ बदलावरुन तापलेलं वातावरण आणि युरोकप-२०१६ फूटबॉल-स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ७५% ब्रिटीश नागरिकांनी मतदानात भाग घेऊन, निसटत्या बहुमताने का होईना (५१.९%  बाजुने तर, ४८.१ विरोधात) पण, ‘ब्रेक्झिट‘च्या (British Exit from European Union) बाजूने दि. २३ जून-२०१६ रोजी कौल दिला आणि या ‘अस्मितेच्या राजकारणा‘चा (Identity Politics) पहिला ‘बळीचा बकरा‘

ब्रेक्झिटचं कवित्व…… Read More »

“वाचाल तर, वाचाल…..”

मुंबई–ठाण्यातली (ज्या महानगरांच्या महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहीलेली आहे !) सर्वसामान्य मराठी माणसं शिवसेनेच्या भ्रष्ट–घराणेबाज व्यवहारांमुळे अक्षरश देशोधडीला लागून १० X १० च्या ‘काडेपेटी’च्या आकाराच्या अनधिकृत बांधकामात, नाईलाजापोटी जगण्याची उमेद हरवून व जगण्याची ‘कोंडी’ स्विकारत, राहयला लागलीयतं आणि शिवसेनेचे पदाधिकारी धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांचे हात हातात घेऊन सारे ’टॉवर्स“मध्ये ऐश्वर्यात राहतायतं. कोण ‘बिल्डर’ बनले… कोण झोपडीदादा… तर,

“वाचाल तर, वाचाल…..” Read More »

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!!

गुजराथ या, नरेंद्र मोदींच्या ‘तथाकथित’ बालेकिल्ल्यातच, नवतरुण ‘हार्दिक’ने दिलेल्या ‘हादऱया’तून नरेंद्र मोदींचा ‘बडय़ा घरचा पोकळ वासा’ अवघ्या जगासमोर लाजिरवाण्या पद्धतीने उघडा पडलायं….. ५६ इंच छाती, आता ५६ इंचाची देखील राहीलेली नाही…. भविष्यात ती साफ पिचून जाईल… बिहार निवडणुकीतला दणदणीत पराभव, फक्त एक सुरूवात मात्र आहे! देशी-विदेशी उद्योगपतींना आणि मिडीयाला हाताशी धरुन हे ‘नरेंद्र मोदी’ नांवाचे

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!! Read More »

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..”

वेद-उपनिषदांसह यच्चयावत एतद्देशीय भारतीय तत्वज्ञानाचा सार असलेली व महन्मंगल तत्वज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली “भगवदगीता”, ही कोणी केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यानं किंवा ‘न’ म्हटल्यानं तिचं महत्त्व वाढतं वा कमी होतं. असं मुळीच नव्हे जसं सोन्याचं वा हि-याचं अंगभूत वा उपजत मूल्य “स्वयंभू-स्वरुपात असतं, तशीच गीतेची महती आहे। ‘भगवदगीते’ला ‘राष्ट्राच्या परिसीमेत बद्ध करणं, म्हणजे कोहिनूराच्या हि-याला

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..” Read More »

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!!

संसदेला ‘हिंद स्वराज्य’ मध्ये त्याकाळी महात्मा गांधी ‘वेश्यागृह’ म्हणाले होते. यापेक्षाही अधिक कडक भाषा वापरण्याचा आपला इरादा म. गांधींनी मुलाखत देतानाच प्रकट केला होता. मग, आजच्याघडीला म. गांधी हयात असते तर, नेमके संसदेच्या किंवा अन्य लोकप्रतिनिधी-सभागृहांच्या बाबत काय बोलले असते? पण, आजच्या कॉंग्रेसी-संस्कृतित असला विचार …करणं, त्यांच्या ‘राजकीय-अॅजेंड्या’त त्याज्य आहे! एकूण सध्या जी राजकीय धूळवड

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!! Read More »

अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा…

लाल, बाल, पाल या त्रिमूर्तिपश्चात स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सेनापती बापट, चिंतामणराव देशमुख अशा एकेक दिग्गज हिमालयाच्या उंचीच्या राजकीय नेतृत्वाची मांदियाळी या भारत देशाला लाभली आणि त्यानंतर अकस्मात ‘अंधारयुग’ सुरू झाले. ‘मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला’ आणि ‘साध्या टेकडीएवढीचं काय…’ अहो रस्त्याच्या स्पीडब्रेकर

अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा… Read More »