डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, या भूमिकेपलिकडे जाऊन…’समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणं, अधिक गरजेचं आहे….
‘राज्यघटनेचा शिल्पकार वा दलितांचा मसीहा’; या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं…म्हणजे, “कोहिनूराच्या हिर्या’ला अंगठीत कोंडून टाकणं!” शिवछत्रपती असोत वा असोत बाबासाहेब…त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं आर्थिक-उन्नयन करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान सुनिश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा ‘नांगरधारी’ शिवछत्रपती (न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे) हे अधिक महत्त्वाचे; तसेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही ‘समतेचा-संदेश’ […]








