Rajan Raje

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, या भूमिकेपलिकडे जाऊन…’समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणं, अधिक गरजेचं आहे….

‘राज्यघटनेचा शिल्पकार वा दलितांचा मसीहा’; या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं…म्हणजे, “कोहिनूराच्या हिर्‍या’ला अंगठीत कोंडून टाकणं!” शिवछत्रपती असोत वा असोत बाबासाहेब…त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं आर्थिक-उन्नयन करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान सुनिश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा ‘नांगरधारी’ शिवछत्रपती (न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे) हे अधिक महत्त्वाचे; तसेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही ‘समतेचा-संदेश’ […]

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, या भूमिकेपलिकडे जाऊन…’समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणं, अधिक गरजेचं आहे…. Read More »

“उडाला तो पक्षी आणि बुडाला तो रुपया….”

वर्ष-२०१४मध्ये मोदी सत्तेवर आल्यापासून एका वर्षातच डाॅलरचा दर ६० रुपयावरुन एकदम ६७ रुपयावर पोहोचला…२० ऑगस्ट-२०१५ला, ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात झालेल्या एका सोहळ्यात भाषण करताना मी म्हटलं होतं की, “नरेंद्र मोदींची त्यांच्या गुज्जू-दोस्तांच्या हितासाठीच केवळ राबवलेली; पण, देशाच्या आम जनतेच्या दृष्टिकोनातून ‘आत्मघातकी’ (‘आत्मनिर्भर’ नव्हेच) असलेली आर्थिक-धोरणे पहाता…भारतीय रुपया त्यांच्या कारकिर्दीतच भाजप सल्लागार मंडळ सदस्य,

“उडाला तो पक्षी आणि बुडाला तो रुपया….” Read More »

कामगार-धर्माची चार आर्य सत्ये….

१) “ही भांडवली-व्यवस्था माझ्यासाठी काम करत नाही; तर, मी त्या व्यवस्थेसाठी काम करतो…केवळ, माझ्या टोकाच्या शोषणातूनच ती चालते व चालू शकते आणि हे दुष्टचक्र थांबवण्याची जबाबदारी माझीच आहे”…. २) “मी कामगार म्हणून ‘राष्ट्रीय-संपत्तीचा निर्माता’ आहे; पण, त्या निर्मीत-संपत्तीतून मी आज बेदखल आहे; कारण, माझ्या श्रमाची आणि रक्ताघामाची भांडवलदारांकडून राजरोस चोरी-दरोडेखोरी होतेय आणि ती चोरी-दरोडेखोरी थांबवण्याचा

कामगार-धर्माची चार आर्य सत्ये…. Read More »

“झोपलेला कामगार, जागा झाल्यावरच क्रांती घडते!”

प्रश्न क्र.१ : अठराव्या शतकातील क्रूर-अन्यायकारक ‘वसाहतवादी’ मनोवृत्तीसारखे भयंकर कामगार-कायदे (ज्याला, संस्कृत भाषेत भाजप-संघीय जाणिवपूर्वक ‘संहिता’ वगैरे गोंडस नावाने संबोधतायत) आणण्याची हिंमत भांडवलदारवर्गाला होतेच कशी? प्रश्न क्र. २ : निवडणुकीत ‘बहुसंख्य मतदार’ असलेल्या कामगारांच्या मतांची वेळोवेळी भीक मागणाऱ्या राज्यकर्त्यांनाही, ती हिंमत कशी काय होते?? प्रश्न क्र. ३ : आणि, जो मराठी वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ आहे (उदा.

“झोपलेला कामगार, जागा झाल्यावरच क्रांती घडते!” Read More »

“सौ सुनार (गिरीश कुबेर) की, एक लुहार (धर्मराज्य) की….”

मी स्वतः चुकूनही ‘लोकसत्ता’ वाचत नाही…पण, काॅ. उदय चौधरींचा फोन आला आणि त्यांनी ते, कामगारघातकी व भांडवलदारवर्गाचे छुपे हस्तक असलेल्या, गिरीश कुबेरांच्या लोकसत्तेचं (सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५चं) ‘संपादकीय’ वाचून, त्यावर मीच प्रतिक्रिया लिहावी…असा, प्रेमळ हक्काने खूपच आग्रह केल्यावर, मी सरसावून पत्रकारितेतल्या या ‘नटवरलाल’चं संपादकीय शोधायला लागलो (ते त्यांनीच लिहीलेलं असावं वा कुणाला तरी तसं सूचित

“सौ सुनार (गिरीश कुबेर) की, एक लुहार (धर्मराज्य) की….” Read More »

२१ नोव्हेंबरचा ‘हुतात्मा-दिन’च का निवडला गेला…???

भांडवलदारवर्गाकडून ‘मालामाल’ होणारी व थेट त्यांची ‘दलाल’ असलेली, भाजप-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’ व एकूणच त्यांची NDA आघाडी… “४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” लादण्यासाठी २१ नोव्हेंबर हाच दिवस का निवडते…???* ‘कंत्राटी-कामगार पद्धती’तल्या गुलामगिरी व नव-अस्पृश्यतेनं महाराष्ट्रातला मराठी-कामगार ग्रासलेला असतानाच…’मराठी-मस्तका’वर अंतिम प्रहार करण्यासाठी व त्यांचं जितंजागतं ‘माणूसपण’ कायमचं संपवण्यासाठीच (“The last nail in the coffin”)…”४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)”

२१ नोव्हेंबरचा ‘हुतात्मा-दिन’च का निवडला गेला…??? Read More »

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…???

गांधी, नेहरुंसारख्या ‘जगन्मान्य’ (‘गोदी-मिडीया’तून रंगवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नव्हेत ते) व्यक्तित्वांना, बदनाम करुन सरळ सरळ विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे…EC व EVM च्या आधारे बेधडक निवडणुका जिंकल्या जात आहेत; तरीही, काँग्रेसवाल्यांची “तू मोठा की, मी मोठा”, ही सुंदोपसुंदी संपायला व त्यांची झोप उडायला तयार नाही! एकटे राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीसह त्यांचा एक चमू, लढतो

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…??? Read More »

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी!

आता तत्पूर्वीच्या घटनाक्रमाची तर्कसंगत मांडणी करुन पाहूया…. ** बिहारच्या विधानसभा-निवडणुकीवर ‘गुजराथी-लाॅबी’चा, दिल्लीतला खुंटा बळकट होणं वा उखडला जाणं अवलंबून असल्याची जनमानसात चर्चा…. ** बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची लक्षणीय वाढलेली टक्केवारी, ‘बीजेपी NDA आघाडीचं पतन मतपेटीत जवळपास बंद करुन ठेवतं…. ** आज बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मतदान…. ** पहेलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध अजून संपलेला नाहीच

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी! Read More »

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’…

आम्ही ‘मनुस्मृती’ जाळली आणि मग, महामानवाची जयंती-मयंती साजरी करण्यात मग्न झालो…आम्ही ‘कामगार’ म्हणून ‘वेतन-बोनस’च्या मर्यादित रिंगणात गरगर फिरायला लागलो आणि अलगद ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या चक्रव्यूहात अडकलो! …आणि, तिकडे ते, हाती अर्धवट जळालेली ‘मनुस्मृती’ घेऊन अचूकपणे-अथकपणे काम करत राहिले…तळागाळातल्या लोकांना पुन्हा मुठभरांच्या वर्णवर्चस्ववादी सापळ्यात अडकवण्यासाठी! …फक्त, फरक एवढाच की, यावेळेस त्या मनुस्मृतीच्या पानोपानी ‘भांडवली-व्यवस्थे’चे काळेकुट्ट रंग भरलेले

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’… Read More »

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!”

‘मतचोरी’तून सत्ता बळकावणारी BJP-RSS अभद्र युती; केवळ, कष्टकरी शेतकऱ्यांचीच नव्हे; तर, देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गाचीही नंबर एकची शत्रू आहे…त्यांच्याकरवी, देशात ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ व ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) यांचा ‘बुलडोझर’ फिरवला जाण्यातून व समस्त कामगारवर्ग ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’च्या अंधारयुगात ढकलला जाण्यातून, ते क्षणोक्षणी दृग्गोचर होतयंच! एवढंच काय, आता अत्युच्चशिक्षित डाॅक्टर वर्ग (विशेषतः, काॅर्पोरेट-हाॅस्पिटल्समधील) व काॅर्पोरेटीय तंत्रज्ञ वर्ग (इंजिनिअर्स)

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!” Read More »