भांडवली व्यवस्था

नेमेची येतो १ मे रोजी, तो कामगार व महाराष्ट्र दिन….

३ काळ्या शेतकरी-कायद्यांचा वरंवटा शेतकऱ्यांवर फिरवण्याचा प्रयोग, शेतकऱ्यांच्या आंदोलनाने व शेकडो शेतकऱ्यांच्या आहुती-बलिदानाने साफ फसल्यानंतर…४ काळ्या कामगार-कायद्यांची ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात, ‘देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार’ या ‘भाजप-संघीय’ ट्रिपल-इंजिन सरकारकडून लागू करण्यात येतेय; याचाच सरळ अर्थ, अर्धमेल्या झालेल्या कामगार-चळवळीला ‘शवपेटी’त कोंडून, शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचं काम सुरु झालंय…. तरीही तुम्ही दारु, सण-उत्सवाच्या नशेत आणि […]

नेमेची येतो १ मे रोजी, तो कामगार व महाराष्ट्र दिन…. Read More »

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?”

ईव्हीएम हेराफेरी /निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात फसवणुकीचा खास भाजपाई गोरखधंदा /इलेक्टोरल-बाॅण्ड, नोटबंदी वगैरे घोटाळ्यांतील काळा-पैसा आणि पराकोटीची राजकीय-नीतिमत्ताशून्यता… या व अशा लोकशाहीविरोधी बाबींच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकाविणारे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत, “महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे!” * …तेव्हा, त्याकामी सर्वप्रथम, *”शिवछत्रपतींचा अगदी ठरवून जाणिवपूर्वक घोर अवमान करणार्‍या, ‘काळीटोपी छाप’ माजी राज्यपाल ‘भगवा सिंग’ कोश्यारी (क्रांतिकारक

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?” Read More »

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा!

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! आता, शिवाजी आणि औरंगजेब, यांचे आपण अगदी थोडक्यात स्वभावदर्शन मांडूया…. ** आमचा शिवाजी सर्वधर्मसमभाव मानणारा, अत्यंत न्यायी व सहिष्णू होता…तर, मोंगलांचा औरंगजेब धर्मद्वेष्टा, अन्यायी व

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! Read More »

हातच्या कंकणाला आरसा कशाला…

‘जपान-द. कोरिया ’सारख्या प्रगत व जगभर औद्योगिक-साम्राज्य उभं करणाऱ्या देशांमध्ये देखील, तुलनेनं अब्जोपतींची (Blood Billionaires) संख्या मोठी नाही वा तिथे फारसे कुणी ‘दरिद्री नारायण’ही नाहीत! मात्र, ज्यांनी ‘दरिद्री नारायण’ ही चपखल संज्ञा वापरली त्या, म. गांधींच्या किंवा ज्यांनी, समतेचा संदेश दिला त्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतासारख्या देशात मात्र, एका बाजुला ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ पध्दतीतले कारखान्यात राबणारे व

हातच्या कंकणाला आरसा कशाला… Read More »

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने….

आचार्य विद्यासागर यांच्यासह शांतिसागर, तरुणसागर, क्षमासागर वगैरे जैन मुनिंविषयी जरुर आदर आहे, आदर असावा…काहीही हरकत नाही. पण, यांनी संख्येने अल्पसंख्य असलेल्या; मात्र, धनसंपदेनं अतिउन्मत्त झालेल्या आपल्या जमातीविरुद्ध कधि आवाज उठवलेला दिसला आपल्याला? कबुतरांना दाणे खिलवणारी; पण, गोरगरीबांच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेणारी…ही जी, या शोषक-जमातीची घृणास्पद धन-लालसा आहे, तिचा उघड निषेध केलाय कधि यांनी?? …तोंडाने एकीकडे

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने…. Read More »

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा…

“आधीच मर्कट तशात मद्य प्याला”…अशी बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा; नाहीतर, यांना बेरोजगारी-अर्धरोजगारीने संत्रस्त झालेला भारतीय तरुणवर्ग भररस्त्यात जोड्याने हाणेल (अमेरिकेतल्या ‘युनायटेड हेल्थकेअर’च्या ब्रायन थाॅम्सन या CEOचं काय झालं, ते स्मरणात ठेवा)! …’भांडवला’चा गुणधर्मच असा (म्हणूनच, कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं) की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’; तशी

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा… Read More »

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)….

“सगळ्याची सोंगं करता येतात…पण, पैशाचं सोंग करता येत नाही”, या उक्तिनुसार गैरमार्गाने (नोटबंदी, इलेक्टोरल-बाॅण्ड, PM Care फंड; तसेच, EVM घोटाळे वगैरे वगैरे माध्यमातून) कमावलेल्या पाशवी बहुमताच्या बळावर, एकूणएक सरकारी-यंत्रणा व सर्व प्रसारमाध्यमं…आपल्या किंवा आपल्या मित्रपरिवारातल्या अब्जाधीशांच्या (Crony-Capitalists) ताब्यात ठेऊन, भारतीय-अर्थव्यवस्थेची लक्तरं, खोट्या सरकारी-आकडेवारीच्या पडद्याआड कितीही झाकू पाहिली; तरी, ‘घसरता रुपया’ काही सावरता येत नाही आणि

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)…. Read More »

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते….

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट ‘साम्यवादा’चा, जसा कार्ल मार्क्सने सांगितला तसा, परिपूर्ण स्विकार केला नसला; तरीही, ‘समतेच्या संदेशा’चा प्रवासही, कुठेतरी त्या साम्यवादी-समाजवादी सडकेवरुनच दौडत होणार, हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावानाला ठाऊक असणारच. त्यादृष्टीनेच, ॲडम स्मिथचे “मुक्त बाजारपेठीय तत्त्वज्ञान, हे ‘अस्पर्श’ राखण्याएवढं ‘अंतिम-सत्य’ वा अतिपवित्र असणं… किंवा, माणूस हे वासनांचं गाठोडं असल्याने प्रत्येक माणूस, हा अविरत आपापला स्वार्थ जपणारा

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते…. Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८

बरोबर महिनाभरानंतर सॅमसंग विजयाचा अन्वयार्थ समाप्त करत असताना…मुद्दामहून हे सांगितलं गेलं पाहिजे की, त्या सॅमसंग ऐतिहासिक विजयाचं अप्रूप-कौतुक यासाठीच कारण, …हल्लीच्या ‘कामगारधर्म’ नावाची चीजच ठाऊक नसलेल्या ‘नाचीज’ कामगारवर्गाला, संघर्षासाठी तयार करणं आणि एकदा तयार केल्यावर संघर्षाच्या ‘अग्निपथा’वर कायम राखणं…हे फार अवघडच नव्हे; तर, अशक्यप्राय काम होत चाललंय! …ज्यांना एरव्ही कंपनीतलं काळंकुत्र देखील विचारत नसतं; अशांना

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८ Read More »

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे!

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे! महाराष्ट्राची निवडणूक आटोपताच ‘बीजेपी’चा हत्ती…आपले खरे दात दाखवायला लागलाय. भाजपा( NDA) सरकारने आता तीन काळ्या कामगार-कायद्यांनी बनलेली ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) झपाट्याने लागू करायला घेतलीय…कल्पनातीत अशा भयंकर गुलामगिरीला व कंपनी-दहशतवादाला रोजच्या रोज तोंड देत काॅर्पोरेटीय क्षेत्रात आणि इतरही छोट्यामोठ्या कंपन्या-कारखान्यांमधून सगळ्यांनाच नोकरी मुठीत धरुन जगावं

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे! Read More »