मजूर-कंत्राटदारी

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय!

नरेंद्र मोदी सरकारने वर्ष, २०१७-१८ मध्ये आणलेली “नीम”… NEEM (National Employability Enhancement Mission) योजना, म्हणजे “नॅशनल एम्प्लाॅयाॅबिलिटी एन्हान्समेंट मिशन” नसून, उद्योगपती-व्यवस्थापकीयवर्गाच्या, चांगलीच पथ्यावर पडणारी (म्हणजे, पडद्यामागून त्यांनीच नरेंद्र मोदीं सरकारकरवी आणलेली) आणि तमाम कामगार-कर्मचारी वर्गाची बेमालूम फसवणूक करत, “कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! “नीम” (NEEM) हे, “स्किल-इंडिया” […]

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »

अन्यथा भविष्यात, १ मे चा महाराष्ट्रदिन व कामगारदिन… हा, “महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांचा ‘मरणदिन’ म्हणूनच साजरा करावा लागेल” !!!

दिल्लीतील ऐतिहासिक ‘लाल किल्ला’, एका उद्योगपतीला भाजपा-शिवसेना सरकारने ‘दत्तक’ दिल्यानंतर, गांधी घराण्याच्या काँग्रेसला जणू एकच कंठ फुटला…. आणि, १९९०-९१ सालीच ‘खाउजा’ धोरणाअंतर्गत, ज्या काँग्रेसी सरकारने देश विकायला सुरुवात केली, तोच काँग्रेस पक्ष आज या ‘खाजगीकरणा’विरुद्ध ‘१० जनपथ’च्या छपरावर चढून आक्रोश करतोय….. काळ ‘सूड’ उगवतो, तो असा…. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाखाली, याच काँग्रेसने देश

अन्यथा भविष्यात, १ मे चा महाराष्ट्रदिन व कामगारदिन… हा, “महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांचा ‘मरणदिन’ म्हणूनच साजरा करावा लागेल” !!! Read More »

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय!

नरेंद्र मोदी सरकारने वर्ष, २०१७-१८ मध्ये आणलेली “नीम”… NEEM (National Employability Enhancement Mission) योजना, म्हणजे “नॅशनल एम्प्लाॅयाॅबिलिटी एन्हान्समेंट मिशन” नसून, उद्योगपती-व्यवस्थापकीयवर्गाच्या, चांगलीच पथ्यावर पडणारी (म्हणजे, पडद्यामागून त्यांनीच नरेंद्र मोदीं सरकारकरवी आणलेली) आणि तमाम कामगार-कर्मचारी वर्गाची बेमालूम फसवणूक करत, “कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! “नीम” (NEEM) हे, “स्किल-इंडिया”

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! Read More »

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो

१) ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ असलेल्या महाराष्ट्रातील “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेचं समूळ उच्चाटन होऊन सर्व कामगार-कर्मचारीवर्ग नोकरीत “कायम” होणार २) कामगार-कर्मचार्‍यांना किमान-वेतन दरमहा रु. २५,०००/- मिळणार ३) दरमहा रु. ४०,०००/- पर्यंत पगाराच्या महाराष्ट्रातील नोकऱ्या, शेवटचा मराठी तरुण-तरुणी कामाला लागेपर्यंत…. फक्त आणि फक्त मराठी-भाषिकांनाच ४) सार्वजनिक क्षेत्रातील मराठी-शाळांना ऊर्जितावस्था आणणार ५) मराठी-भाषिक शाळांमध्ये शिकणार्‍या पाल्यांना व पालकांना शासनातर्फे सार्वजनिक

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो Read More »

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!”

भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!! “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं,

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!” Read More »

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!”

ही कहाणी आहे, ‘महाराष्ट्र’ नांवाच्या, आटपाट नगरीतील ‘मराठा समाजा’ची…. ज्या, समाजानं “प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता…” असा या, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीला ‘शककर्ता’ राजा दिला, त्या समाजावरच “पौर्णिमा ते अमावस्या” अशी पीछेहाटीची अवदसा ओढवलीच कशी ??? बायबलमध्ये लिहून ठेवलयं, “जेव्हा एखाद झाड… कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रतीचं आहे, हे तपासायचं असतं, तेव्हा इतर काही धडपड न करता, थेट

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!” Read More »

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!”

‘धर्मराज्य पक्ष’…. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजन राजे’….. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय नेता’…. ज्यानं, आपल्या देशात (विशेषतः, महाराष्ट्रात) थैमान घालणाऱ्या, आधुनिक-व्यवस्थेतील “गुलामगिरी व नव-अस्पृश्यते”प्रमाणे असणाऱ्या “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेविरुद्ध, गेल्या २५-३० वर्षांपासून “धर्मयुद्ध” पुकारलेले आहे ! जशा, वृक्षाच्या आधाराशिवाय ‘वेली’ जगू व वाढू शकत नाहीत…. तशीच अवस्था, कामगार-कर्मचारी चळवळीची असल्याने, तिला सदैव ‘राजकीय आधारवडा’ची गरज

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!” Read More »

“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???”

सर्वप्रथम, ‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष, या नात्याने मला हे गर्जून सांगू द्या की, “सर्वश्री अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांति-संकल्पना स्विकारणारा ‘धर्मराज्य पक्ष’ हा, भारतातील सर्वात पहिला नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे !” “अर्थक्रांति-संकल्पनेचं चर्चाचर्वित याअगोदरच अनेक माध्यमांतून व विविध स्तरांवरुन फार मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यानं, त्या तपशीलात फारसं न डोकावता; फक्त, या सोन्यासारख्या संकल्पनेच्या संदर्भातील राजकीय अपरिहार्यता, चळवळीतील कार्यकर्त्यांची

“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???” Read More »

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन)

निर्दय जागतिकीकरण – विवेकशून्य आधुनिकीकरण – बेलगाम संगणकीकरण, यांच्या चौफेर उधळलेल्या ‘वारू’च्या टापांखाली चिरडल्या गेलेल्या कामगारांची सर्वत्र अवस्था अतिशय दयनीय व शोचनीय झालेली आहे. मूठभरांनी मणामणांनी घरं भरायची आणि कणाकणांसाठी आगरी-कोळी-कुणबी-मराठा-आंबेडकरी इ. बहुजनांनी तिष्ठत… तळमळत उंबरठयावर उभं रहायचं! लूट… फक्त संधिसाधू लूट, असा जणू ‘जीवनमंत्र’ झालाय. रोजगार ‘भरपूर’ आहेत पण ते एकतर मोठया कारखान्यांमधून कंत्राटदारीच्या

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन) Read More »