Rajan Raje

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???……

दहा वर्षांची घुसमट, एकदाची निर्धाराने संपवत, तनुश्री दत्ताने नाना पाटेकराला जमिनीवर पाठ टेकवायला लावलीय…. या तिच्या हिंमतीबद्दल तिचं कौतुक करावं, तेवढं थोडचं! सर्वसाधारणपणे, भारतीय समाजातीलच काय; पण, अगदी प्रगत राष्ट्रांमधील (अगदी हाॅलिवूडच्या ‘मर्लिन मन्रोसारख्या ख्यातनाम नट्यासुद्धा) महिला वा महिला कलाकार, आपल्या लैंगिक शोषणाबद्दल वा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलायला सहजी तयार होत नाहीत (त्यातलं सध्या भयंकर गाजणारं […]

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???…… Read More »

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं……

संजय निरुपमा, मुंबई-महाराष्ट्र आमच्या जीवावर चालतो, या उद्दाम आणि फुकाच्या वल्गना तू आता एकदम बंद कर… तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… बघूया, त्यामुळे, मुुंबईसह  असलेला “शिवबा-संतां”चा महाराष्ट्र, तुझ्या भाकिताप्रमाणे कोसळतो की, तुम्ही युपी-बिहारवाले भीकेला लागता, ते एकदाचे समजेल !!! सालं, आमच्या जीवावर जगायचं आणि आम्हालाच

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… Read More »

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!!

‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष म्हणून नव्हे; तर, या देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मला अशा मोठ्या राजकीय व्यक्तिंच्या निधनापश्चात, काही साधेसुधे प्रश्न सतावत रहातात. प्रश्न असा…. ज्याची गेले काही दिवस, नंतर पुढे कित्येक महिने, वर्षे…. विविध दूरदर्शन वाहिन्यांवरुन साग्रसंगीत, रसभरीत (अगदी अंतःकरण गदगदून टाकणारी) चर्चा चालू राहील…. ती स्व. अटल बिहारी वाजपेयींची ‘संवेदनशीलता’, ही अशी विशिष्ट कोंदणातच

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!! Read More »

“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार

औरंगाबादला कारखान्यांवर संतप्त मराठा-कंत्राटी कामगारांचा मोर्चा वळताच…. शरद पवार कळवळले. मराठा-आंदोलनात दुर्दैवाने आजवर, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचं एवढं नुकसान होत होतं, तरी असा कळवळा शरद पवारांना फुटला नव्हता, तो एकदम कारखान्यांकडेच शोषित मराठा तरुणाईच्या संतापाचा रोख वळताच फुटला… हे, उद्योग जगतावरचं शरद पवारप्रणित ‘पाॅवरफूल प्रेम’ नव्हे काय? पवार-ठाकरे परिवारांच्या दळभद्री राजकारणामुळेच धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र

“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार Read More »

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”!

आॅगस्ट १, “पृथ्वी सीमोल्लंघन दिन” (August 1, Earth Overshoot Day…. the world is living on borrowed time) पृथ्वीवरील मानवजात, “आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! एखाद्या वर्षाच्या ज्यादिवशी, निसर्गाच्या वार्षिक पुनर्निर्माण क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात, मानवजात नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, लाकूड, अन्न, कार्बन इ.) अधिकचा वापर करु लागते…. तो दिवस, “पृथ्वी सीमोल्लंघन वा मर्यादोल्लंघन दिन” म्हणून ओळखला

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! Read More »

NOTA (None Of The Above)….

लोकशाहीच्या चार आधारस्तंभांच्या उभारणीत व अस्तित्वात पायाभूत स्वरुपात असणाऱ्या ‘निवडणूक-प्रक्रिये’त क्रांतिकारक सुधारणा करण्याच्या दृष्टीने, आजवर कुठलाही संसदेत-विधिमंडळात प्रभावी कायदा पारित झालेला नसतानाही…. आपल्या कार्यकक्षेत व अधिकारात, दीर्घकाळ प्रलंबित असणारे पाऊल, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग प्रमुख सर्वश्री. जे. एस. सहारिया उचलू पहातायत…. लक्षणांवर नव्हे; तर मूळ रोगाच्या आसाला भिडून उपचार करु पहाणाऱ्या या ‘धन्वंतरी’ला “धर्मराज्य पक्षा”चा

NOTA (None Of The Above)…. Read More »

लंगडे विकृत नेतृत्त्व आणि लंगडणारा समाज (गिरीदंतजातककथा)

{ही गिरीदंतजातककथा, मला ‘संजय पगारे’ (८९२८४५५१०५) या एका जाज्वल्य बुध्द धम्म प्रसारकाने व्हाॅट्स्अॅपवर पाठवली. पण, ही कथा एवढी मर्मग्राही आहे आणि तिचा संदेश एवढा व्यापक व मर्मभेदी आहे…. की, तो प्रखर संदेश, वर उल्लेखल्याप्रमाणे फक्त, अनुसूचित जातीजमातींपुरताच मर्यादित नसून, महाराष्ट्रातील तमाम ‘मराठी माणसां’ना तंतोतंत लागू आहे.} म. फुले, टिळक, सावरकर, आंबेडकर, सेनापती बापट, एस.एम. जोशी,

लंगडे विकृत नेतृत्त्व आणि लंगडणारा समाज (गिरीदंतजातककथा) Read More »

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”

अवघं चराचर ‘अस्तित्व’ हेच, ‘ईश्वरतत्त्व’ मानणारी… सगळं जगच आपल्या प्रेमळ कवेत सामावून घेणारी विश्वगामी, विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”! …. शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात एक असा महान संत होऊन गेला, ज्यानं मराठी-संस्कृतीचं हे लेणं, खालील शब्दात अतिशय प्रत्ययकारीरित्या अधोरेखित केलयं…. संत सावता माळीं चे हे उच्चारण, जणू संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’सारखाच एक ‘अमृतानुभव’ होय !!!! “कांदा, मुळा, भाजी

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती” Read More »

“रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू !!!”

नुकतेच २२ जून-२०१८ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वश्री जे. चेलमेश्वर हे सात वर्षांच्या सेवेपश्चात, एका वादळी पार्श्वभूमीवर निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालय नांवाच्या संस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आणि न्यायमूर्ती नेमणुकीच्या पद्धतीतलं दोष दिग्दर्शन करणारी, अशी ती वादळी पार्श्वभूमी होती… “हिटलरसुद्धा सत्तेत कायम रहाणार नव्हता व सर्वोच्च न्यायालयातील उद्वेगजनक सद्दस्थितीही (ज्यात, न्यायदानातल्या मूलभूत पवित्र मूल्यांचा र्‍हास होत

“रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू !!!” Read More »

आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल…

“जर, इंग्लंड नांवाचं छोट्याश्या बेटासारखं एकच राष्ट्र, आपल्या अनैसर्गिक-अशाश्वत स्वरुपाच्या औद्योगिक उत्पादनांमुळे आणि त्यांचा बेगुमान वापर करण्याच्या बेबंद जीवनशैलीमुळे…. मानवी-शोषणासह निसर्ग-पर्यावरणविषयक एवढ्या मोठ्या समस्या जगापुढे निर्माण करु शकत असेल…. तर, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या खंडप्राय देशाने, तोच विनाशकारी ‘पाश्चात्य विकासाचा मार्ग’ निवडला तर काय अनर्थ ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी. इंग्लंड-युरोपच्या आर्थिक साम्राज्यवादाने आज, जगातल्या मानवीसमूहांना

आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल… Read More »