Rajan Raje

आता, सगळं शांत शांत झाल्यावर…

“आता, सगळं शांत शांत झाल्यावर… कोणाला इस्पितळात रक्ताची गरज लागल्यास, आपापल्या जातीचे लेबल असलेल्या रक्ताच्या बाटल्या घ्या… पोलीस स्टेशन आणि कोर्टात आपापल्या जातीचे वकील न्या… म्हणजे, जिंकलात जातभाईंनो” !!! जळलेल्या मोटरसायकली, बहुशः कंत्राटी-कामगार असलेल्या मराठी पोरांनी हौशीनं बँकेचं कर्ज काढून घेतलेल्या असणार (अर्थात, औकात नसताना पोरींवर इंप्रेशन पाडायला!) ….तोडफोड झालेल्या बसेस तर, आमच्याच मायमराठी जनतेच्या […]

आता, सगळं शांत शांत झाल्यावर… Read More »

आमचा सुरेश अखेर गेलाच

आजच्या काळात ‘कार्यकर्ता’ शब्द उच्चारताच, जी आपल्या डोळ्यापुढे एक कलंकित ‘प्रतिमा’ उभी राहते, त्या प्रतिमेला पूर्णतः छेद देणारे जाज्वल्य कार्यकर्ते मला माझ्या तीन तपांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत लाभले, हे माझं फार मोठं भाग्य होय! नाही म्हणायला, आपले स्वार्थी व बदमाषीचे ‘अॅजेंडे’ घेऊन फिरणारे अत्यंत हिणकस कार्यकर्तेही याच कालखंडात दुर्दैवाने नशिबी आलेच…. त्यातले तर काही, चोवीस तास

आमचा सुरेश अखेर गेलाच Read More »

“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!”

….. ‘आजच्या (दि. २९ नोव्हेंबर-२०१७, बुधवार) दैनिक ‘पुण्यनगरी’च्या ‘वेध’ सदरात माननीय संपादक सोपान बोंगाणे यांनी, आपल्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! याच संदर्भात, सध्या “भारतीय नद्यांचं पुनरुज्जीवन”, हा विषय घेऊन सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या वतीने औद्योगिक कंपन्यांच्या व जनतेच्या सहकार्यातून भारतभर एक फार मोठी मोहीम हाती

“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!” Read More »

सदोष मनुष्यवध!

२६ मे २०१६ रोजी डोंबिवली औद्योगिक वसाहतीमध्ये प्रोबेस कंपनीतील केमिकल रिअॅक्टरचा स्फोट होऊन १३ कामगारांचा मृत्यू झाला होता. पाच दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील अॅल्युफिन या कंपनीत कॉम्प्रेसरच्या स्फोटाने पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आणि त्यात राजेंद्र जावळे या कामगाराचा मृत्यू झाला. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात फेज-२ मधल्याच ‘इंडो अमाइन’ या कंपनीत स्फोट झाला होता. डोंबिवली

सदोष मनुष्यवध! Read More »

‘कमल हसन’प्रमाणे ‘अनिल बोकिल’, मनाचा मोठेपणा दाखवणार काय???

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर-२०१६ रोजी नरेंद्र मोदी सरकारकडून धक्कादायकरित्या करण्यात आलेल्या, ‘नोटाबंदी’चं समर्थन करुन ‘घोडचूक’ करणाऱ्या, प्रख्यात बाॅलिवूड अभिनेता कमल हसनने ‘जाहीर माफी’ मागून मनाचा मोठेपणा दाखवला….. आता, अशी जाहीर माफी किंवा किमानपक्षी, जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी, ‘अर्थक्रांती विधेयक व संकल्पने’चे प्रणेते श्री. अनिल बोकिल यांची आहे! ….पण, तेवढा मनाचा मोठेपणा स्वतः अनिल बोकिल

‘कमल हसन’प्रमाणे ‘अनिल बोकिल’, मनाचा मोठेपणा दाखवणार काय??? Read More »

“सर, माफ करा…. मला तुमची अपेक्षा मला पुरी करता येणे नाही !!!”

{मुरलेले राजकारणी कसे असतात, हे काही कुणाला सांगायला नको. म्हणूनच, “पाॅलिटिक्स् इज द् लास्ट रेझाॅर्ट ऑफ् स्काॅऊंड्रल्स्”, असं म्हटलं जातं. ज्याच्या पायावर डोकं ठेवावसं वाटावा, असा मला आयुष्यात भेटलेला एकमेव राजकारणी म्हणजे, आमचे कै. गोपाळ दुख॔डेसर! जेव्हा हे गृहस्थ प्रथम मला सावंतवाडीत भेटले; तेव्हाच जाणवलं की, तहहयात दगदग सोसून, वयाच्या मानानं हा अवलिया पार थकून

“सर, माफ करा…. मला तुमची अपेक्षा मला पुरी करता येणे नाही !!!” Read More »

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो

१) ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ असलेल्या महाराष्ट्रातील “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेचं समूळ उच्चाटन होऊन सर्व कामगार-कर्मचारीवर्ग नोकरीत “कायम” होणार २) कामगार-कर्मचार्‍यांना किमान-वेतन दरमहा रु. २५,०००/- मिळणार ३) दरमहा रु. ४०,०००/- पर्यंत पगाराच्या महाराष्ट्रातील नोकऱ्या, शेवटचा मराठी तरुण-तरुणी कामाला लागेपर्यंत…. फक्त आणि फक्त मराठी-भाषिकांनाच ४) सार्वजनिक क्षेत्रातील मराठी-शाळांना ऊर्जितावस्था आणणार ५) मराठी-भाषिक शाळांमध्ये शिकणार्‍या पाल्यांना व पालकांना शासनातर्फे सार्वजनिक

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो Read More »

वाचा, पहा, ऐका आणि खुशाल झोपा काढा…..

हा माणूस, ‘जैन-मुनी’ आहे की, ‘भाजपचा एजंट’? एरव्ही मोह, माया व इतर षडरिपुंपासून दूर असण्याचा टेंभा मिरवणाऱ्या या जैन मुनिवरांनी मुंबईतील संख्येने २० लाखांवर आणि पैशाने अतिशय गब्बर असलेल्या (‘पराग शहा’ या घाटकोपरच्या विजयी भाजपा उमेदवाराची केवळ ‘घोषित’ संपत्तीचं ६९० कोटींची… मग, ‘अघोषित’ संपत्ती केवढी???), जैन समाजाची मते व संसाधने (पर्यायाने गुज्जू-मारवाड्यांनी सुद्धा), भाजपकडे वळवण्यामागे

वाचा, पहा, ऐका आणि खुशाल झोपा काढा….. Read More »

शिवछत्रपती महाराज की जय……..

सरकारी शिवजयंतिच्या पूर्वसंध्येला…. शिवछत्रपतींच्या राजनीतिची कालसुसंगततेची मांडणी !!! ज्ञात मानवी इतिहासाचा धांडोळा घेतला तर, हे सहजी ध्यानात येईल की, माणसामाणसांमध्ये आजवर हजारोंनी युद्धे आणि जातधर्मीय दंगे झालेले आहेत…. याचाच अर्थ, मानवीसमूह एकतर युद्ध किंवा दंगे करण्यात रंगलेले असतात किंवा त्याच्या पुढील तयारीत तरी रमलेले असतात…. याचं प्रमुख कारण म्हणजे, “राजकारणी आणि त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा”! जे

शिवछत्रपती महाराज की जय…….. Read More »

टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे….

टोकाची आर्थिक-विषमता, हे भारतीय-समाजातील एक अत्यंत खळबळजनक, धोकादायक आणि प्रस्थापित ‘रक्तपिपासू-शोषक’ राजकीय-व्यवस्थेला अतिशय अडचणीचं ठरणारं उघडंनागडं ‘सत्य’ आहे! त्यामुळेच, ‘गरिबी-हटाव’चा ‘नारा’ सद्यस्थितीत महत्त्वाचा नसून ‘आर्थिक-विषमते’वर युद्धपातळीवरुन हल्लाबोल करणं, ही काळाची गरज आहे… तरीही, तारस्वरात ‘गरिबी-हटाव’चेच नारे देशात दिले जातायतं….. ‘धर्मराज्य पक्ष’ वगळता एकही राजकीय पक्ष, या मुद्द्यावर ना गांभीर्याने विचार करताना…. ना कुठली कृति करताना,

टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे…. Read More »