भांडवली व्यवस्था

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’

भांडवली-व्यवस्थेच्या दमनकारी दबावाविरुद्ध; तसेच, कंपनी-दहशतवादाविरोधात (Corporate-Terrorism) छाती पुढे काढून तडफेनं व एकजुटीने संघर्षरत रहात… तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखं तावूनसुलाखून निघण्याऐवजी, मराठी कामगार… आपापसात फाटाफूट करत व ‘‘कामगारच कामगाराचा शत्रू बनत’’… गद्दारी व पळपुटेपणा करताना दिसतोय… दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ सेवन करत, ‘‘नरेचि केला हीन किती नर’’, याचा अवघ्या कामगार-विश्वाला कंपन्या-कंपन्यांमधून परिचय देतोय, […]

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ Read More »

कॉर्पोरेट-दहशतवाद

गेली अनेक वर्षांपासून कंपनी-दहशतवादाबद्दल (Corporate-Terrorism) कंठशोष करुन आम्ही बोलतो आहोत, जीव तोडून लिहीतो आहोत… पण, लक्षात कोण घेतो ??? ‘दहशतवाद’, हा कोणाचाही, कुठल्याही कारणाने असो… त्याची नांगी वेळीच साफ ठेचून टाकलीच पाहीजे! विशेषतः, “जातधर्मीय आणि काॅर्पोरेटीय दहशतवाद” तर, जिथे असेल तिथे, जिथे दिसेल तिथे… कठोरपणे समूळ निपटून काढलाच पाहीजे. …मात्र, जिथे ‘सततच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध दाद मागणं

कॉर्पोरेट-दहशतवाद Read More »

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ???

इतर कोणत्याही तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा, म. गांधींचीच ‘हत्या’ घडवून आणावी… असं, ‘नथ्थू-पंथीयां’ना (नथुराम गोडसे पंथीयांना) तीव्रतेनं का वाटलं असावं??? …तर, त्याचं उत्तर हे की, “म. गांधी, ही केवळ काही विशिष्ट उद्देशपूर्तिच्या मर्यादित रिंगणात काम करणारी ‘व्यक्ति’ नव्हती; तर ती सगळ्या जगण्याच्याच आसाला आणि जगण्याच्या व्यामिश्रतेला भिडलेली आणि त्यावर, विद्रोही-कृतिसह प्रभावी भाष्य करणारी ‘महाशक्ति’ होती!

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ??? Read More »

‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’

कामगार नावाची ‘गाय’ आणि मोदी-शहा सरकार नावाचा ‘कसाई’ व यासंदर्भातील, एक चपखल अर्थवाही मराठी म्हणं, ती अशी… ‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’ ‘कामगारद्रोही’ नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपा सरकारचा ‘‘NEEM’’ (National ‘Employability’ Enhancement Mission नव्हे; तर, National ‘Exploitation’ Enhancement Mission) च्या भयंकर घातकी प्रहारानंतर, भोळसट-बावळट कामगारवर्गाला ‘महामूर्ख’ किंवा संपूर्ण ‘उल्लू’ बनवू पहाणारा, प्राॅव्हिडंट फंडा संदर्भात (भविष्यनिर्वाह निधी),

‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’ Read More »

“चाहे देश बरबाद हो या और कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे….” अकल के दुश्मन और अंध मोदी-भक्तों की पुकार!

उठताबसता भ्रष्टाचारावर अत्यंत दांभिकतेनं रेटून खोटी बोंबाबोंब करणाऱ्या ‘‘मोदी-शहा’’ या दुकलीने आजवर केंद्रात सक्षम ‘लोकपाल-यंत्रणा’ निर्माण केली का? आणि, त्यांच्या गुजराथमध्येही सक्षम ‘लोकायुक्त’ आणला का?? शेकडो कोटींचे घोटाळे करुन देशाबाहेर पळणारे बहुतेक सगळे धनदांडगे गुजराथी; तर, सैन्यदलात किती गुजराथी? …मांडा बघू त्रैराशिक आणि शोधा, स्वतःच त्याचं उत्तर !!! तब्बल सहा वर्षे उलटून गेली…. ‘‘लोकपाल आणि

“चाहे देश बरबाद हो या और कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे….” अकल के दुश्मन और अंध मोदी-भक्तों की पुकार! Read More »

“रोज नऊ तास काम… कामगार धोरणात होऊ घातलेला बदल!”

“राममंदिर बांधू पहाणाऱ्या” नरेंद्र मोदी सरकारने, आता, एकदाचा “नऊच कशाला, रोज चोवीस तास काम” असा, “रावणाला साजेसा अत्याचारी रावणी-धोरण बदल करुन मोकळं व्हावंच आणि त्यांच्या पक्षाच्या झोळीत हजारो कोटी मुक्तहस्ताने ओतणाऱ्या उद्योगपतींच्या ऋणातून उतराई व्हावंच!!! …..या निमित्ताने “मुँह में राम, बगल में रावण”, या नव्या म्हणीचा, झोपी गेलेल्या आणि झोपेतच प्रस्थापित पक्षांचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या

“रोज नऊ तास काम… कामगार धोरणात होऊ घातलेला बदल!” Read More »

अन्यथा भविष्यात, १ मे चा महाराष्ट्रदिन व कामगारदिन… हा, “महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांचा ‘मरणदिन’ म्हणूनच साजरा करावा लागेल” !!!

दिल्लीतील ऐतिहासिक ‘लाल किल्ला’, एका उद्योगपतीला भाजपा-शिवसेना सरकारने ‘दत्तक’ दिल्यानंतर, गांधी घराण्याच्या काँग्रेसला जणू एकच कंठ फुटला…. आणि, १९९०-९१ सालीच ‘खाउजा’ धोरणाअंतर्गत, ज्या काँग्रेसी सरकारने देश विकायला सुरुवात केली, तोच काँग्रेस पक्ष आज या ‘खाजगीकरणा’विरुद्ध ‘१० जनपथ’च्या छपरावर चढून आक्रोश करतोय….. काळ ‘सूड’ उगवतो, तो असा…. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाखाली, याच काँग्रेसने देश

अन्यथा भविष्यात, १ मे चा महाराष्ट्रदिन व कामगारदिन… हा, “महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांचा ‘मरणदिन’ म्हणूनच साजरा करावा लागेल” !!! Read More »

मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची नियुक्ती का होत नाही?

१९ नोव्हेंबर रोजी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे… “५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड”, हा जो जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा संदेश सोशलमिडीयातून  प्रसारित करण्यात आला होता; त्यात, ‘अंध व आपमतलबी’ मोदीभक्तांना, खालील पहिलाच प्रश्न विचारण्यात आल्याचं वाचकांच्या स्मरणात असेलच…… १) “जर, नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची

मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची नियुक्ती का होत नाही? Read More »

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे…

भिवंडी कब्रस्थान पोलीसचौकी बांधकाम प्रकरणातील दंगेखोर सुटले… दळभद्री न्यायव्यवस्था व कालबाह्य भारतीय फौजदारी कायदे/गुन्हेगारी दंडसंहितेमुळे याच दंगलीत, ‘शहीद’ झालेल्या रमेश जगताप व बी. एस. गांगुर्डे या आमच्या दोन पोलीस-बांधवांचे खुनी मारेकरीही उद्या सुटतील! शासन बदलल्याला तब्बल दोन वर्ष होऊन गेली…. तथाकथित, मुस्लिमधार्जिणे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार जाऊन, ‘हिंदुत्वा’चे नारे लावणारे भाजपा-शिवसेनेचं सरकार आलं; पण, आजही ‘त्या’ भिवंडीच्या

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे… Read More »

ब्रेक्झिटचं कवित्व……

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक व अमेरिकन ‘गन-लाॅ‘ बदलण्याची धामधूम, फ्रान्समध्ये ‘कामगार-कायदे‘ बदलावरुन तापलेलं वातावरण आणि युरोकप-२०१६ फूटबॉल-स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ७५% ब्रिटीश नागरिकांनी मतदानात भाग घेऊन, निसटत्या बहुमताने का होईना (५१.९%  बाजुने तर, ४८.१ विरोधात) पण, ‘ब्रेक्झिट‘च्या (British Exit from European Union) बाजूने दि. २३ जून-२०१६ रोजी कौल दिला आणि या ‘अस्मितेच्या राजकारणा‘चा (Identity Politics) पहिला ‘बळीचा बकरा‘

ब्रेक्झिटचं कवित्व…… Read More »