भ्रष्टाचार आणि घोटाळे

सरकार, प्रशासन, खाजगी क्षेत्र, किंवा कोणत्याही संस्थांतील भ्रष्टाचार, वित्तीय घोटाळे, गैरव्यवस्थापन, कंत्राट घोटाळे, पारदर्शकतेचा अभाव, आणि सत्तेचा गैरवापर यावर प्रकाश टाकते.
यामध्ये तथ्याधारित लेख, विश्लेषण, वृत्तांचा आढावा, जनहित याचिका, आणि जनतेचा पैसाच कसा लुबाडला जातो याविषयी माहिती समाविष्ट केली जाईल.

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?”

ईव्हीएम हेराफेरी /निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात फसवणुकीचा खास भाजपाई गोरखधंदा /इलेक्टोरल-बाॅण्ड, नोटबंदी वगैरे घोटाळ्यांतील काळा-पैसा आणि पराकोटीची राजकीय-नीतिमत्ताशून्यता… या व अशा लोकशाहीविरोधी बाबींच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकाविणारे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत, “महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे!” * …तेव्हा, त्याकामी सर्वप्रथम, *”शिवछत्रपतींचा अगदी ठरवून जाणिवपूर्वक घोर अवमान करणार्‍या, ‘काळीटोपी छाप’ माजी राज्यपाल ‘भगवा सिंग’ कोश्यारी (क्रांतिकारक […]

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?” Read More »

कुणाल कामरा विरुद्ध ‘टायरखाली’ धमकी : महाराष्ट्राच्या न्यायबुद्धीवरचा आघात

आपल्याला १२३ कोटींच्या मुंबई-बँक घोटाळ्यातून सुखरुप बाहेर काढणाऱ्या देवेंद्रजींचे ‘नंबर एकचे हुजरे’ असलेल्या प्रवीण दरेकरांची ‘सभागृहाचा अवमान’ झाल्याची कारवाई करण्याची आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंची ‘टायरखाली घालण्याची’… स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामराबाबतची आत्यंतिक बेजबाबदार व दहशत निर्माण करु पहाणारी भाषा, हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला भयंकर कलंक आहे आणि तो सहजी पुसला जाणार नाही! ** जेव्हा, प्रत्यक्षात विधिमंडळाचे

कुणाल कामरा विरुद्ध ‘टायरखाली’ धमकी : महाराष्ट्राच्या न्यायबुद्धीवरचा आघात Read More »

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…???

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…??? …हा प्रश्न, फक्त बीडच्या धनंजय मुंडेंपुरता किंवा त्यांचा ‘हस्तक’ असलेल्या ‘वाल्मिकी’ कराड-गँगपुरता मर्यादित नाहीच…या गुन्हेगारी-खंडणीखोर राजकारणाचा विळखा पुरत्या महाराष्ट्राला केव्हाचाच पडलाय (इथे ‘आकाचा आका’ म्हटल्या गेलेल्या धनंजय मुंडेंचा कालपर्यंत ‘आका’ कोण होता आणि आज कोण आहे, हा प्रश्नही अप्रस्तुत ठरु नये)! सध्या, एकीकडे

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…??? Read More »

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा…

“फडणवीसांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचा ‘उत्तर प्रदेश’ होण्याची प्रक्रिया गतिमान झालीय…फडणवीस हे महाराष्ट्राचे, कायदा धाब्यावर बसवणारे, नवे ‘योगी आदित्यनाथ’ झालेयत का?” …हे ‘एन्काऊंटर’, केवळ एका आरोपीचं नसून संपूर्ण ‘न्यायालयीन-व्यवस्थे’चं देखील आहेच, हे कसं विसरुन चालेल?? —————————————————————— सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपती-दर्शनासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या जाण्यातून…या देशाची न्यायव्यवस्था, भाजप-संघाची ‘बटीक’ झाल्याचा (याचा अर्थ,

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा… Read More »

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान”

पाश्चात्य देशात, जनता स्वतः वर्गणी जमा करुन आपापल्या राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे उभारते…अगदी, अमेरिकन ‘स्वातंत्र्य देवतेचा पुतळा’ (Statue Of Liberty) देखील, विविध सार्वजनिक-उपक्रम राबवून, जनतेनेच पैसा गोळा करुन उभारला होता. पण, आपल्याकडे जनतेला भांडवली-व्यवस्थेनं एवढं ‘कफल्लक’ आणि राजकारण्यांनी एवढं ‘फुकटं’ बनवून ठेवलंय की, जनता पुतळे उभारण्यासाठी सोडाच; पण, निवडणुका लढवण्यासाठी देखील कपर्दिकही (जुन्या काळचं नाणं) देत

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान” Read More »

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा”

कुठे ते, “तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दूँगा” म्हणणारे कडवे-देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुठे, “तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” म्हणणारे बडवे-देशद्रोही ‘गुजराथी-लाॅबी’वाले… ज्यांच्यासाठी, “देश चालवणं म्हणजे केवळ, आपल्या खास गुजराथी-भाषिक भांडवलदार मित्रांसाठी मांडलेला-थाटलेला, एक अतिशय किफायतशीर धंदाच होय! …अशी क्षुद्रवृत्ती धारण करणाऱ्या शासनकर्त्यांच्या हिणकस, समाजघातकी व्यापारी-वृत्तीकडे पाहूनच, ‘खलील जिब्रान’

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” Read More »

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!!

सत्तेवर येताच दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून खेचून आणण्याची भंपक भाषा करणारा ‘भाजपा’…स्वतःच ‘दाऊद इब्राहिम’चा बाप बनलाय आणि त्या विपरीत अर्थाने, खरोखरीच भाजपाने दाऊद इब्राहिमला भारतात आणून आपला शब्द पाळला (भले मग, स्विसबँकेतला काळा पैसा आणायचं आणि त्यातून प्रत्येक भारतीयाच्या जनधन खात्यात १५ लाख रु. टाकायचं, राहून का जाईना); त्याबद्दल, भारतीय जनतेनं भाजपाच्या दिल्लीश्वर धेंडांचं अभिनंदनच करायला

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!! Read More »

‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’…

स्टेट बँकेच्या १२ हजार कोटींच्या ‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा भाजपा कथित व रचित… ‘दिल्ली-दारुकांडा’तल्या सैतानी-सत्तेच्या ‘दारुची धुंदी’ डोळ्यावर चढलेल्या; पण, आतून अत्यंत ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधारी सैतानांना…२०२४च्या लोकसभा-निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्याचं अजून दुसरं प्रभावी लक्षण, काय असू शकेल…??? या देशाला घडवलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं;

‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’… Read More »

‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल

छत्तीसगडच्या आपल्या निवडणूक-जाहीरनाम्यात, ज्या भाजपाने ‘हसदेव’च्या जंगलातल्या कोळसा-खाणकामाला, तेथील जनतेशी केलेली गद्दारी व धोका म्हटलं होतं व सत्तेवर येताच, ते खाणकाम थांबवण्याचा ‘वादा’ (खरं म्हणजे, ‘चुनावी-जुमला’) केला होता…त्याच, ‘हसदेव’च्या जंगलातल्या, ३०,००० प्राचीन वृक्षांवर, भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेवर येताच तत्काळ गदा आली! स्थानिक गावांमधील सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना व गेली १० वर्षे त्याविरोधात चळवळ करणाऱ्यांना…सलग तीन

‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल Read More »

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ???

विक्रांत कर्णिक, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ते या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) आहेत… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत,

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ??? Read More »