Rajan Raje

‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला!

“उधमपूर, गुरुदासपूर, पठाणकोट नंतर ‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला! भित्रट व आत्यंतिक स्वार्थी अशी दलाल-व्यापारीवृत्ती सत्तेत, म्हणून थेट संरक्षणतळांवरच सातत्याने हल्ला!!!” ५६” के ‘चुनावी’ सीनेवालों, अबतक ५६ फौजी तो कब के ‘शहीद’ हो चुके…. अब क्या ५६ सौ शहींदों की ‘शहादत’ का इंतजार है??? “वो एक को मारेंगे…. तो हम पाँच को मार […]

‘उरी-हल्ला’… हा, भारताच्या ऊरी झालेला नापाक सुरीहल्ला! Read More »

‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..!

सार्वजनिक सण-उत्सव-पूजा-पार्टीसंस्कृति यांच्या प्रचंड भाऊगर्दीमुळे, आधीच ‘ग्लानी’त गेलेला सामान्य ‘मराठी माणूस’, वाढदिवसांच्या ‘वाढीव’ सुळसुळाटामुळे, आकण्ठ ग्लानीत बुडून गुलामगिरी भोगू लागलायं. मराठी घरातली ‘आवक’ फारशी वाढायला तयार नाही…. पण, ‘जावकी’त मात्र, वाढदिवसाच्या खर्चाची नवी भर पडत, जैन-गुज्जू-मारवाडी व्यापाऱ्यांचं (तुम्हाला ‘नादी’ लावून), अधिकचं चांगभलं होताना दिसतयं. अशा फाजील उत्सवप्रियतेमुळे सण-उत्सव काळात, लक्ष्मीच्या पाऊलखुणा उलट्या पडताना दिसू लागल्यात….

‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..! Read More »

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे…

भिवंडी कब्रस्थान पोलीसचौकी बांधकाम प्रकरणातील दंगेखोर सुटले… दळभद्री न्यायव्यवस्था व कालबाह्य भारतीय फौजदारी कायदे/गुन्हेगारी दंडसंहितेमुळे याच दंगलीत, ‘शहीद’ झालेल्या रमेश जगताप व बी. एस. गांगुर्डे या आमच्या दोन पोलीस-बांधवांचे खुनी मारेकरीही उद्या सुटतील! शासन बदलल्याला तब्बल दोन वर्ष होऊन गेली…. तथाकथित, मुस्लिमधार्जिणे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार जाऊन, ‘हिंदुत्वा’चे नारे लावणारे भाजपा-शिवसेनेचं सरकार आलं; पण, आजही ‘त्या’ भिवंडीच्या

मराठी तरुणाईनं बेगडी व ढोंगी राजकारण समजून घेण्याची नितांत गरज आहे… Read More »

कै. विलास शिंदेंच बलिदान, फुकट जाऊ देणं एक महापातक ठरू शकतं!

वाहतूक हवालदार ‘विलास शिंदें’चं दुःखद निधन, हे आज उभ्या महाराष्ट्रातल्या घराघरातलं ‘आक्रंदन’ बनलयं!…. जशी, १९६२च्या भारत-चीन युद्धात “भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी”, ही नागरिकांच्या आत्म्याची तडफड महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली होती…. तशीच तडफड, काल ‘तुकाराम ओंबळें’साठी आणि आज ‘विलास शिंदें’साठी, महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या ‘आत्म्या’ची होतेयं! ज्यांच्या हृदयाचा एक साधा ठोकाही, माझ्या

कै. विलास शिंदेंच बलिदान, फुकट जाऊ देणं एक महापातक ठरू शकतं! Read More »

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली……

“सावित्रीमाई पाहुणी आली, गेली रस्त्यावरुन वाहून… भिंत खचली, कठडा तुटला, पूल अर्धा गेला वाहून…. जाता जाता, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले…. पती-प्राणार्थ झुंजणारीनं, शेकडों जीवांना यमसदनी कसे धाडले….” १९२८ साली ब्रिटीशांनी बांधलेला (मे-२०१६ रोजीच्या रिपोर्टनुसार शासन दरबारी उत्तम स्थितीतला पूल, अशी आश्चर्यकारक नोंद असलेला) सावित्री नदीवरचा पूल वाहून जातो आणि कागदाच्या होडीसारख्या वरुन जाणाऱ्या

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली…… Read More »

ब्रेक्झिटचं कवित्व……

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक व अमेरिकन ‘गन-लाॅ‘ बदलण्याची धामधूम, फ्रान्समध्ये ‘कामगार-कायदे‘ बदलावरुन तापलेलं वातावरण आणि युरोकप-२०१६ फूटबॉल-स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ७५% ब्रिटीश नागरिकांनी मतदानात भाग घेऊन, निसटत्या बहुमताने का होईना (५१.९%  बाजुने तर, ४८.१ विरोधात) पण, ‘ब्रेक्झिट‘च्या (British Exit from European Union) बाजूने दि. २३ जून-२०१६ रोजी कौल दिला आणि या ‘अस्मितेच्या राजकारणा‘चा (Identity Politics) पहिला ‘बळीचा बकरा‘

ब्रेक्झिटचं कवित्व…… Read More »

रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेचा “डोंबिवली-रक्तसंबंध” ……

“डोंबिवलीतील कालपरवाच झालेला ‘प्रोबस’ या रसायन-औषधनिर्माण कंपनीतील भीषण स्फोट, हा केवळ एक ‘अपघात’ होता का ? २६ मे-२०१६ ला दुपारी अकराच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीत जे घडलं तो ‘अपघात’ नव्हता; तर, या ‘शोषक-रक्तपिपासू व्यवस्थे’ने (Vampire-State) पैशाच्या हव्यासापोटी केलेल्या गैरव्यवहारांच्या मालिकेतून अटळपणे घडणारा एक ‘घातपात’ होता ! ‘अपघात’ असे घडत नसतात… अपघातांच्या मागे कधि फारसा कार्यकारणभाव नसतो….

रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेचा “डोंबिवली-रक्तसंबंध” …… Read More »

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ???

‘संविधान-मोर्चा’ या एका वैचारिक घुसळणं व अभिसरण करणार्‍या एका चांगल्या ग्रुपमध्ये मला खालील प्रश्न विचारण्यात आला होता…. प्रश्न : ‘धर्मराज्य पक्षा’च्या नांवात असलेलं व त्या पणाला अभिप्रेत असलेलं…. “धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? माझं वरील प्रश्नाला थोडक्यात उत्तर : ‘धर्मराज्य’ म्हणजे काय…. हा, अनेकवेळा, अनेकप्रसंगी मला विचारला गेलेला एक चांगला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नातच

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? Read More »

‘अक्षय्य-तृतीये’चं महत्त्व…. “सोनं खरेदीसाठी नव्हे; तर, मातीतून ‘सोनं’ पिकवण्यासाठी !!!”

‘अक्षय्य-तृतीये’सारख्या मुहूर्तांच्या दिवशी चढ्या भावाने सोनारांकडून (हल्ली त्यांना लब्धप्रतिष्ठीत भाषेत ‘ज्वेलर्स’ म्हटलं जातं…. भले मग, ते सर्वसाधारण श्रमिक-कामगारांसारखेच रस्त्यावर उतरून ‘संपा’सारखी आंदोलने भले का करेनात…. अर्थात, ‘कंत्राटी-कामगार’ पद्धतीसारखी ‘गुलामगिरी’ व ‘नव-अस्पृश्यता’ मौजूद असताना व अत्यंत तुटपुंजे पगारमान असतानाही, हल्लीचे ‘गळपटलेले’ वीर्यहिन व थंडगार कामगार, संपाचा साधा विचारही करण्यास धजावत नाहीत, ही बाब अलाहिदा !) सोनं

‘अक्षय्य-तृतीये’चं महत्त्व…. “सोनं खरेदीसाठी नव्हे; तर, मातीतून ‘सोनं’ पिकवण्यासाठी !!!” Read More »

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी

मोहनदास करमचंद गांधी, हे व्यक्तिमत्त्व यासाठी जगात ‘महान’ आणि तो यासाठी ‘महात्मा’…. कारण, अलिकडच्या काळातील हा एकमेव भारतीय, ज्याची ‘प्रज्ञा’ जगण्याच्या सगळ्याच संदर्भांच्या ‘आसा’ला भिडलेली होती ! …….अध्यात्म, समाजकारण, राजकारण, शाश्वत स्वरुपाची निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैली-अर्थशास्त्र-विकासाचं प्रारूप, ‘ग्राहको देवो भव’ मानणारी उद्योग-व्यापार नीति, शाश्वत नैसर्गिक-शेती, निसर्गोपचार, ‘रामराज्य, अंत्योदय, अस्पृश्यता-निर्मूलन, अहिंसा, मौनव्रता”‘चा पुरस्कार, ‘पहने सो कांते और कांते

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी Read More »